भारताचा ऑस्ट्रेलियावर 'विराट' विजय

मोहालीमध्ये भारतानं ऑस्ट्रेलियाचा पराभव करत टी 20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये धडक मारली आहे. भारताच्या या विजयाचा शिल्पकार ठरला तो विराट कोहली. विराट कोहलीनं 51 बॉलमध्ये 82 रनची अफलातून खेळी केली. 

Updated: Mar 27, 2016, 10:59 PM IST
भारताचा ऑस्ट्रेलियावर 'विराट' विजय title=

मोहाली: मोहालीमध्ये भारतानं ऑस्ट्रेलियाचा पराभव करत टी 20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये धडक मारली आहे. भारताच्या या विजयाचा शिल्पकार ठरला तो विराट कोहली. विराट कोहलीनं 51 बॉलमध्ये 82 रनची अफलातून खेळी केली. 

टॉस जिंकून ऑस्ट्रेलियानं पहिले बॅटिंग करायचा निर्णय घेतला आणि 20 ओव्हरमध्ये 160 रन केल्या, आणि भारतापुढे 161 रनचं आव्हान ठेवलं. आधीच्या मॅचप्रमाणे या मॅचमध्येही भारताची खराब सुरुवात झाली. रोहित शर्मा आणि शिखर धवन स्वस्तामध्ये आऊट झाले. तर रैनालाही चमकदार कामगिरी करण्यात आली नाही. 

त्यानंतर मात्र मोहालीच्या मैदानामध्ये सबकुछ विराट हेच चित्र पाहायला मिळालं. विराटनं पहिले युवराज आणि नंतर धोनीच्या मदतीनं भारताला विजय मिळवून दिला. शेवटच्या ओव्हरला 4 रन पाहिजे असताना नेहमीप्रमाणेच कॅप्टन धोनीनं विजयी फोर मारत भारताला जिंकवून दिलं.