युवराज सिंग पुन्हा स्वत:ला सिद्ध करणार ?

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये दारुण पराभव झाल्यानंतर आता टी-20मध्ये बदला घेण्यासाठी टीम इंडिया मैदानात उतरेल. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या 3 मॅचच्या टी-20 मालिकेला मंगळवारपासून सुरुवात होतेय. ऍडलेडमध्ये ही पहिली मॅच होणार आहे.

Updated: Jan 25, 2016, 06:20 PM IST
युवराज सिंग पुन्हा स्वत:ला सिद्ध करणार ? title=

ऍडलेड: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये दारुण पराभव झाल्यानंतर आता टी-20मध्ये बदला घेण्यासाठी टीम इंडिया मैदानात उतरेल. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या 3 मॅचच्या टी-20 मालिकेला मंगळवारपासून सुरुवात होतेय. ऍडलेडमध्ये ही पहिली मॅच होणार आहे.

पण या मॅचमध्ये सगळ्याचं लक्ष असेल ते कमबॅक मॅन युवराज सिंगवर. 2014 च्या टी-20 वर्ल्ड कप फायनलनंतर युवराज सिंग पहिल्यांदाच टीम इंडियाकडून खेळणार आहे. श्रीलंकेविरुद्धची ती मॅच युवराजसाठी आणि टीम इंडियासाठी फारच खराब ठरली. या मॅचमध्ये युवराजनं 21 बॉलमध्ये फक्त 11 रन केल्या होत्या. सोशल मीडियावरही युवराजवर याच इनिंगमुळे मोठी टीका झाली होती. फायनलमधल्या पराभवाला युवराजच जबाबदार आहे अशा प्रतिक्रियाही सोशल नेटवर्किंगवर उमटल्या होत्या.

त्यामुळे कॅन्सरवर प्रभावी मात करत टीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकवणाऱ्या युवराजला आता पुन्हा एकदा स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली आहे.