विराट कोहलीच्या टीकेला बीसीसीआयचं प्रत्युत्तर

दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्याआधी सुरु असलेल्या श्रीलंका दौऱ्याच्या नियजोनावरून विराट कोहलीनं बीसीसीआयवर टीका केली होती.

Shreyas deshpande श्रेयस देशपांडे | Updated: Nov 24, 2017, 11:05 PM IST
विराट कोहलीच्या टीकेला बीसीसीआयचं प्रत्युत्तर  title=

मुंबई : दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्याआधी सुरु असलेल्या श्रीलंका दौऱ्याच्या नियजोनावरून विराट कोहलीनं बीसीसीआयवर टीका केली होती. विराट कोहलीच्या या टीकेवर आता बीसीसीआयनं प्रतिक्रिया दिली आहे. विराट कोहलीचं हे मत गंभीरतेनं घेण्याची गरज असल्याचं वक्तव्य बीसीसीआयचे कार्यवाहक अध्यक्ष सी.के.खन्ना यांनी केलं आहे.

विराट भारतीय टीमचा कॅप्टन आहे आणि क्रिकेटबाबत विराटनं केलेल्या वक्तव्यांचा गंभीरतेनं पाहिलं पाहिजे. खेळाडू थकत असतील तर त्याचाही विचार व्हावा, असं खन्ना म्हणाले. भविष्यात घरच्या मैदानात होणाऱ्या सीरजच्या नियोजनावर लक्ष दिलं जाईल, अशी ग्वाही खन्ना यांनी दिली.

खेळाडूंना विश्रांती न देता लागोपाठ तीन सीरिजटचं आयोजन करणं कितपत योग्य आहे, याबाबत योग्य ठिकाणी प्रश्न उपस्थित केले पाहिजेत. या मुद्द्यावर ९ डिसेंबरला होणाऱ्या बैठकीमध्ये चर्चा झाली तर चांगलं होईल, असं खन्ना म्हणाले.

आयपीएल सुरु झाल्यानंतर भारतीय टीम बिना ब्रेक क्रिकेट खेळत आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी, वेस्ट इंडिज, श्रीलंका दौरा आणि त्यानंतर घरच्या मैदानात ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि श्रीलंकेविरुद्ध लागोपाठ ३ सीरिजमध्ये २३ मॅच भारतानं खेळल्या आहे. 

काय म्हणाला होता विराट?

कोणत्याही मालिकेच्या तयारीसाठी किमान एका महिन्याचा वेळ मिळायला हवा. मात्र, तो मिळत नाही. नाईलाजानं आम्हाला मिळेल त्या वेळात तयारी करावी लागते. या साऱ्याचा खेळाडूंच्या कामगिरीवर परिणाम होतोय,  अशी खंत व्यक्त त्याने केली.

दक्षिण अफ्रिकेच्या दौऱ्याआधी आमच्या हातात केवळ दोन दिवस आहेत. आमच्याकडे याशिवाय दुसरा पर्याय नाही. या दोन दिवसांत आम्हाला सर्व तयारी करावी लागणार आहे. सध्या श्रीलंका मालिका सुरु आहे. आणि स्वत:ला फिटही ठेवावं लागणार आहे, असे विराटने बोलून दाखवले.

क्रिकेट खेळाचे वेळापत्रक व्यस्त आहे. कोणताही परदेश दौरा असला तर अन्य संघ तयारीसाठी खूप वेळ घेतात. याउलट टीम इंडियाची स्थिती आहे. कसोटी मालिका संपल्यानंतर क्रिकेटपटूंच्या कामगिरीवर बोलेल जाते. वेळप्रसंगी  टीकाही केली जाते. मात्र, वेळ नसेल तर खेळाडू तरी काय करणार, असे थेट सवाल विराटने यावेळी उपस्थित केला.