भारताला हरवणे ऑस्ट्रेलियासाठी सोपे नाही - गांगुली

पुढील महिन्यात भारत - ऑस्ट्रेलिया यांच्यात वनडे आणि टी-२० मालिका रंगणार आहे. या मालिकेत यजमान भारताला हरवणे ऑस्ट्रेलियासाठी सोपे नसणार असल्याचे भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने म्हटलंय.

Updated: Aug 19, 2017, 09:44 PM IST
भारताला हरवणे ऑस्ट्रेलियासाठी सोपे नाही - गांगुली  title=

कोलकाता : पुढील महिन्यात भारत - ऑस्ट्रेलिया यांच्यात वनडे आणि टी-२० मालिका रंगणार आहे. या मालिकेत यजमान भारताला हरवणे ऑस्ट्रेलियासाठी सोपे नसणार असल्याचे भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने म्हटलंय.

ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटर स्टार्कच्या अनुपस्थितीत विराट कोहलीच्या संघाला मिळणाऱ्या फायद्याबाबत गांगुली म्हणाला, भारताला भारतात हरवणे ऑस्ट्रेलियासाठी सोपे असणार नाहीये.

ऑस्ट्रेलियाचा संघ पुढील महिन्यात भारत दौऱ्यावर येतोय. या दौऱ्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या पाच वनडे तर तीन टी-२० सामन्यांची मालिका रंगणार आहे. 

सध्या भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील कसोटी मालिकेत भारताने श्रीलंकेविरुद्ध निर्भेळ यश मिळवलेय. तर उद्यापासून पाच सामन्यांच्या वनडे मालिकेला सुरुवात होतेय.