आलिया भट्टचा लग्नाबाबत मोठा खुलासा

चाहत्यांना देणार सुखद धक्का 

आलिया भट्टचा लग्नाबाबत मोठा खुलासा title=

मुंबई : 'राझी' सिनेमातील अभिनयामुळे आलिया भट्टची जोरदार चर्चा झाली. एवढंच काय तर आलिया आणि रणबीरच्या नात्यावर आता बॉलिवूड मंडळी देखील बोलू लागली आहेत. असं असताना रणबीर आणि आलिया आपल्या नात्याबद्दल मात्र फार गुप्तता पाळत असताना दिसत आहे. ब्रम्हास्त्र या सिनेमाच्या निमित्ताने हे दोघे एकत्र आले आणि यांच्यात गोड प्रेमाची सुरूवात झाली.  

आलिया भट्ट ही कधीच आपल्या पर्सनल लाईफबद्दल बोलताना दिसत नाही. आतापर्यंत तिचं नाव वरूण धवन आणि सिद्धार्थ मल्होत्रासोबत जोडलं गेलं. पण हे नातं तिने किंवा त्यांनी देखील स्वीकारलं नाही. मात्र आता तिचं नाव रणबीर कपूरसोबत जोडलं गेलं. आणि याबाबत रणबीर सिंहने एका मुलाखतीत हे नातं नवीन असल्यामुळे काहीच बोलू शकत नाही असं सांगून ते स्वीकारलं. 

आलिया भट्ट आता २५ वर्षाची यशस्वी अभिनेत्री असून तिच्या राझी या सिनेमाने १०० करोड रुपयाचा गल्ला केला आहे. दिलेल्या मुलाखतीत आलिया भट्टने आपल्या लग्नाबद्दल मनमोकळीपणाने बोलली असून चाहत्यांना सुखद धक्का देणार असल्याचं ही तीने कबुल केलं आहे. आलिया म्हणते की, अद्याप लग्नाबद्दल माझ्या काही डोक्यात नाही. पण खरं सांगू, मी असा कुणाचाच विचार करू शकत नाही. मी फक्त पुढे चालत नाही जे काही होईल ते सहज होईल. 

लोक विचार करत आहे त्याच्या आधीच मी लग्न करून लोकांनाच नव्हे स्वतःला देखील एक आश्चर्याचा धक्का देऊ शकते. सध्या तरी मी लग्नाचा काहीही विचार केलेला नाहीय पण खरे सांगू या गोष्टींचा मी विचार करेन अशी मी व्यक्तीच नाहीये. जसा जसा काळ पुढे सरकतो, तशा तशा काही गोष्टी या आपोआप होतात असे मला वाटते. मी हा निर्णय अचानकच घेईन असे मला कधीकधी वाटते. उगाचच आयुष्याचा खूप जास्त विचार करणारी मी व्यक्ती नाहीये. ज्यावेळी तुम्ही कधीही विचार करत नाही, त्याचवेळी काही चांगल्या गोष्टी अनपेक्षितपणे घडतात असे मला वाटते. आलियाने केला मोठा खुलासा बहुदा लोकं असा विचार करत असतील की, मी ३० वर्षाची झाल्यावर लग्न करेन पण मी त्या अगोदर लग्न करून चाहत्यांना सुखद धक्का देऊ शकते.