'बिग बॉस ११' : फायनलला ढिंचॅक पूजा आणि अर्शी खानमध्ये भांडण

ग्रॅण्ड फिनाले अजून एका कारणासाठी चर्चेत राहिला. ढिंचॅक पूजा आणि अर्शी खान यांच्यात भांडण झाली.

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Jan 15, 2018, 09:16 AM IST
'बिग बॉस ११' : फायनलला ढिंचॅक पूजा आणि अर्शी खानमध्ये भांडण  title=

नवी दिल्ली : शिल्पा शिंदे ही 'बिग बॉस ११' या शोची विनर ठरली. पण ग्रॅण्ड फिनाले अजून एका कारणासाठी चर्चेत राहिला. ढिंचॅक पूजा आणि अर्शी खान यांच्यात भांडण झाली. सलमानने आपल्या मजेशिर अंदाजात हे भांडण शांत केले.

सलमानच हा फायनलचा इव्हेंट शो होस्ट करत होता. 'पॅडमॅन' अक्षय कुमारदेखील त्याच्यासोबत सेटवर होता. शोमधील सर्व स्पर्धक फायनलमध्ये पोहोचले. 

'टॉप ४ मध्ये आम्ही पाहिजे होतो'

सलमानने अर्शीला प्रश्न विचारला की टॉप ४ मध्ये कोण असायला हव होतं? तर पुनीत ऐवजी मी, सपना चौधरी, हितेन तेजवानी आणि आकाश डादलानी यापैकी एक असायला हवे होते असे ती म्हणाली. 

ढिंचॅक पूजाला खेळता येत नाही 

ढिंचॅक पूजा का नाही?, असा प्रश्न सलमानने विचारला. त्यावेळी तिला खेळता येत नाही, असे अर्शी खानने सांगितले. तू याला उत्तर दिले पाहिजे, असे सलमानने ढिंचॅक पूजाला सांगितले.

तिच्याजागेवरच मी घरातून बेघर झाली हे अर्शी आता विसरल्याचे ढिंचॅक पूजाने सांगितले. त्यानंतर सलमानने हसत-खेळत हे प्रकरण तिथेच संपवले.