ऋषी कपूरचं ट्विट, रणबीर - आलियाच लग्न ठरलं ?

ऋषी कपूर यांच ट्विट चर्चेत 

ऋषी कपूरचं ट्विट, रणबीर - आलियाच लग्न ठरलं ?  title=

मुंबई : ऋषी कपूर कायम आपल्या ट्विट्समुळे चर्चेत असतात. कधी आपल्या ट्विटमधून ते राग व्यक्त करतात तर कधी कुणाची मस्करी करण्यासाठी... ऋषी कपूर कायम मायक्रो ब्लॉगिंग साइटवर बिंदास अंदाजात दिसतात. मात्र मंगळवारी ऋषी कपूर यांनी असं ट्विट केलं की त्यामुळे सोशल मीडियावर एकच धुमाकूळ घातला. 

काय म्हटलं ट्विटमध्ये 

ऋषी कपूर यांनी आपल्या ट्विटमध्ये भट्ट कुटुंबाचं भरभरून कौतुक केलं आहे. ज्यावर युझर्सने लगेच आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या अफेअरशी याचा संबंध जोडला. एवढंच नाही तर आलिया - रणबीरच्या नात्याला ऋषी कपूर यांचा होकार असल्याचं देखील म्हटलं आहे.

ऋषी कपूर यांनी या ट्विटमध्ये म्हटलं की, मी भट्ट कुटुंबातील उत्कृष्ठ कलाकार मंडळीसोबत काम केलं आहे. महेश भट्ट, मुकेश भट्ट, रोबिन भट्ट, पूर्णिमा जी, सोनी भट्ट, पूजा भट्ट, इमराश हाशमी, आलिया भट्ट... तुमच्या सगळ्यांचे आभार... 

कोणताही संबंध नसताना अचानक ऋषी कपूर यांनी भट्ट कुटुंबाचं असं भरभरून कौतुक केलं. यावर युझर्सना प्रश्न पडला की असं कौतुक का केलं. अनेकांनी हे ट्विट म्हणजे आलिया भट्ट ऋषी कपूर यांच्या घरी कन्फर्म येणं असं आहे. अनेकांनी तर कपूर कुटुंबियांना शुभेच्छा देखील दिल्या आहेत. 

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर हे सध्या अयान मुखर्जी यांचा 'ब्रम्हास्त्र' या सिनेमाचं शुटिंग करत आहे. यावेळी त्यांच्यातील जवळीक वाढत आहे. आणि याची चर्चा जोरदार रंगली आहे.