अनुष्कासोबत विराटचीही 'बिदाई', नवविवाहीत जोडपं आता या शहरात राहणार...

टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली आणि बॉलिवूड स्टार अनुष्का शर्मा हे दोघंही इटलीमध्ये विवाहबंधनात अडकले. ११ डिसेंबर रोजी इटलीच्या टस्कनमध्ये विरुष्काचा विवाहसोहळा पार पडला.

Updated: Dec 12, 2017, 04:36 PM IST
अनुष्कासोबत विराटचीही 'बिदाई', नवविवाहीत जोडपं आता या शहरात राहणार...  title=

मुंबई : टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली आणि बॉलिवूड स्टार अनुष्का शर्मा हे दोघंही इटलीमध्ये विवाहबंधनात अडकले. ११ डिसेंबर रोजी इटलीच्या टस्कनमध्ये विरुष्काचा विवाहसोहळा पार पडला.

या विवाहानंतर या दोघांबद्दल लोकांना पडलेला सर्वात मोठा प्रश्न म्हणजे विवाहानंतर अनुष्का आपल्या सासरी म्हणजे दिल्लीला राहणार? की मुंबईत हे दोघं स्थायिक होणार?

तर या प्रश्नाचं उत्तर दोघांच्या प्रवक्त्यानं देऊन टाकलंय. विवाहानंतर अनुष्काची बिदाई तर पार पडली... पण, आता विराटचीही त्याच्या शहरातून 'बिदाई' होणार आहे. 

हे नवविवाहीत जोडपं वरळीच्या आपल्या नव्या फ्लॅटमध्ये राहणार आहे. विराट आणि अनुष्का डिसेंबरमध्येच मुंबईत आपल्या घरी शिफ्ट होणार आहेत. 

इतकंच नाही तर अनुष्का विराटसोबत दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यातही दिसणार आहे. इथ भारताला दक्षिण आफ्रिकेसोबत तीन टेस्ट, ६ वन डे आणि ३ टी-२० सिरीज खेळावी लागणार आहे.