स्कूल बस अपघातात १३ मुलांचा मृत्यू

 कुशीनगर जिह्यात आज सकाळी झालेल्या भीषण अपघातात १३ शाळकरी मुलांचा मृत्यू झालाय. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Apr 26, 2018, 08:32 AM IST
स्कूल बस अपघातात १३ मुलांचा मृत्यू title=

लखनऊ : उत्तर प्रदेशातल्या कुशीनगर जिह्यात आज सकाळी झालेल्या भीषण अपघातात १३ शाळकरी मुलांचा मृत्यू झालाय. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलेय. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. कुशीनगर जिल्ह्यातील बिशनपुरा गावाजवळ आज एक मानवरहित रेल्वे फाटकावर एक्स्प्रेसनं स्कूल बसला धडक दिली. त्यावेळी बसमध्ये २५ मुलं होती. अपघातात १३  मुलांचा मृत्यू झाल्याचं प्राथमिक वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेय.