गुजरात-हिमाचलच्या निकालावर राहुल गांधी म्हणतात...

गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपचं कमळ फुललं आहे.

Shreyas deshpande श्रेयस देशपांडे | Updated: Dec 18, 2017, 05:07 PM IST
गुजरात-हिमाचलच्या निकालावर राहुल गांधी म्हणतात...  title=

नवी दिल्ली : गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपचं कमळ फुललं आहे. हिमाचलमध्ये भाजपची कामगिरी चांगली झाली असली तरी नरेंद्र मोदी आणि भाजपचा गड असलेल्या गुजरातमध्ये मात्र भाजपची दमछाक झाली. या दोन्ही निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

दोन्ही राज्यांच्या जनतेनं दिलेले निकाल काँग्रेसनं स्वीकारला आहे. तसंच दोन्ही राज्यांमधल्या नव्या सरकारचं अभिनंदन. गुजरात आणि हिमाचलमधल्या नागरिकांनी मला दिलेल्या प्रेमाबद्दल त्यांचे धन्यवाद, असं ट्विट राहुल गांधींनी केलं आहे.

माझ्या काँग्रेस कार्यकर्त्यांमुळे माझी मान अभिमानानं उंचावली आहे. तुम्ही ज्यांच्याशी लढलात त्यांच्यापासून वेगळे आहात कारण तुम्ही नैतिकतेनं लढलात. सभ्यता आणि धैर्य हीच काँग्रेसची खरी ताकद आहे याचं प्रात्यक्षिक तुम्ही दाखवलंत, असं म्हणून राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांचं कौतुक केलं.