मोदी सरकारमधील मंत्र्यावर 6 महिला पत्रकारांचे लैंगिक अत्याचाराचे आरोप

बॉलिवूडनंतर राजकीय क्षेत्रातही खळबळ

Updated: Oct 10, 2018, 11:39 AM IST
मोदी सरकारमधील मंत्र्यावर 6 महिला पत्रकारांचे लैंगिक अत्याचाराचे आरोप title=

मुंबई : मीटूचं वादळ केंद्रीय परराष्ट्र राज्य मंत्री एम जे अबकर यांच्यापर्यंत येऊन धडकलं आहे. एम जे अकबर हे इंग्रजी वृत्तपत्राचे संपादक असताना लैंगिक शोषण केल्याचे आरोप सहा महिला पत्रकारांनी केले आहेत. केंद्रीय मंत्र्यावर असे आरोप झाल्यानं आता याप्रकरणी राजकारणही तापू लागलं आहे.

सहा महिला पत्रकारांचे आरोप

भाजपचे खासदार उदित राज अकबर यांच्या विरोधात आरोप करणाऱ्या महिला 10 वर्ष गप्प का होत्या, असा प्रश्न विचारला जातोय. तर काँग्रेसनं या प्रकरणी मंत्र्यांनी मौन बाळगून चालणार नाही, लवकरात लवकर स्पष्टीकरण देणे गरजेचं आहे असं म्हटलं आहे. माजी पत्रकार आणि संपादक राहिलेल्या अकबर यांच्यावर 6 महिलांनी अत्यंत गंभीर आरोप केले आहेत.

राजकीय क्षेत्रांमधूनही तक्रार 

बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने नाना पाटेकर यांच्यावर अश्लिल वर्तन केल्याचा आरोप केल्यानंतर हॉलिवूडसह संपूर्ण भारतात एकच खळबळ उडाली आहे. यानंतर सोशल मीडियावर #MeToo मोहिमेची सुरुवात झाली. यानंतर अनेक महिला आपल्यावर झालेल्या अत्याचाराबाबत बोलण्यासाठी समोर येत आहेत. पत्रकारीतेनंतर आता राजकीय क्षेत्रांमधूनही तक्रारी पुढे येत आहेत.  #MeToo मोहिमेत अनेक मोठे चेहरे समोर येत आहेत. 

मोदी सरकारमधील मंत्र्यावर 6 महिला पत्रकारांचे लैंगिक अत्याचाराचे आरोप

महिला पत्रकाराचा खुलासा 

सोशल मीडियावर एका महिला पत्रकाराने खुलासा करत मुंबईतील एका हॉटेलमध्ये अकबर यांच्याशी झालेल्या भेटीबाबतचा अनुभव सांगितला आहे. अकबर हे हॉटेलच्या रुममध्ये मुलाखती घ्यायचे आणि दारु पिण्यासाठीही ऑफर करायचे. फोनवर बोलताना घाणेरड्या भाषेचा वापर, अश्लिल मॅसेज पाठवणे आणि असभ्य कमेंट करणे असे आरोप त्यांच्यावर करण्यात आले आहेत.