'२१-२२ नोव्हेंबरला १० लाख शेतकरी जंतर-मंतरवर'

येत्या २१ आणि २२ नोव्हेंबरला दहा लाख शेतक-यांना घेऊन दिल्लीच्या जंतरमंतरवर धडक देणार असल्याचं राजू शेट्टींनी सांगितलंय.

Updated: Aug 13, 2017, 08:47 PM IST
'२१-२२ नोव्हेंबरला १० लाख शेतकरी जंतर-मंतरवर' title=

अमरावती : येत्या २१ आणि २२ नोव्हेंबरला दहा लाख शेतक-यांना घेऊन दिल्लीच्या जंतरमंतरवर धडक देणार असल्याचं राजू शेट्टींनी सांगितलंय. संपूर्ण कर्जमाफी राज्य आणि केंद्र शासनाला करावी लागेल, अन्यथा २०१९ च्या निवडणुकीत दिल्लीच्या लाल किल्यावरून मोदींना भाषण देण्यासाठी सत्ता मिळणार नसल्याचं राजू शेट्टींनी म्हटलंय.

अमरावतीमध्ये सुकाणू समिती आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आयोजित मेळाव्यातील अध्यक्षीय भाषण देतांना ते बोलते होते. त्याचप्रमाणे सरकारनं शेतक-यांची चेष्टा चालवली असून कर्जमाफी ही शुद्ध फसवणूक असल्याची टीका खासदार राजू शेट्टींनी केलीय.