तुकाराम मुंढे यांचा सत्ताधाऱ्यांना झटका

नाशिक शहरात आता राजकीय पदाधिकारी आणि प्रशासन यांच्यात करवाढ युध्द टोकाला पोहोचलं आहे.

Updated: Jul 21, 2018, 10:41 PM IST
तुकाराम मुंढे यांचा सत्ताधाऱ्यांना झटका title=

नाशिक : करवाढ युद्ध पेटलेय. शहरात आता राजकीय पदाधिकारी आणि प्रशासन यांच्यात करवाढ युध्द टोकाला पोहोचलं आहे. यामध्ये अधिकारांचा प्रश्न ऐरणीवर आला असून, कोण बरोबर याची अहमहमिका लागली आहे. दरम्यान पालिका महासभेनं ठराव रद्द केल्यानंतर आता हा ठरावच बेकायदेशीर ठरवून, आयुक्तांनी काही दिवस वाट बघा असे संकेत दिले आहेत. 

नाशिकमध्ये पालिका अधिकारी, राजकीय पदाधिकारी यांच्यात संघर्ष वाढीला लागलाय. कोण बरोबर आणि कोण चुकीची अशीच स्पर्धा पाहायला मिळत आहेत. यामध्ये अधिकारांचा प्रश्न ऐरणीवर आलाय.