'लोकसभा निवडणुकीत बटण कचा-कचा दाबा आणि पाहिजे तेवढा निधी घ्या' अजित पवारांच्या वक्तव्यानं नवा वाद

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातलं मतदान काही दिवसांवर येऊन ठेपलं, सर्वच पक्षांच्या प्रचाराला वेग आला असतानाच महायुतीतले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या वक्तव्याने नवा वाद निर्माण झाला आहे. 

राजीव कासले | Updated: Apr 17, 2024, 02:26 PM IST
'लोकसभा निवडणुकीत बटण कचा-कचा दाबा आणि पाहिजे तेवढा निधी घ्या' अजित पवारांच्या वक्तव्यानं नवा वाद title=

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांकडू (Ajit Pawar) भेटीगाठीचं सत्र सुरु आहे. बुधवारी अजित पवार यांनी इंदापूरातील डॉक्टर, वकिल आणि व्यापाऱ्यांशी संवाद साधला. पण यावेळी अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद (Controversy) उफाळून येण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीला (Loksabha Election 2024) बटण कचाकचा दाबा, तुम्हाला निधी पाहिजे तेवढा देतो असं अजित पवार यांनी म्हटलंय. त्यामुळे एक नवीन वाद उभा राहिलाय. उपमुख्यमंत्री अजित पवारच मतदारांना आमिष दाखवत असल्याची टीका विरोधक करताय. 

काय म्हणाले अजित पवार?
आपल्या भागाला निधी देण्यासाठी मी कमी पडणार नाही. मात्र तुम्ही मतदान करायला गेल्यावर मशीनमध्ये देखील आपल्या उमेदवाराच्या समोरचं बटन दाबा कचाकचा कचा म्हणजे मला सुध्दा निधी द्यायला बरं वाटेल. नाहीतर माझा पण हात आकडता येईल असे म्हणतातच सभेमध्ये अशा पिकला. ते इंदापुरात व्यापारी वकील संघटनेच्या बैठकीमध्ये बोलत होते

'नाहीतर द्रोपदीसारखं करावं लागेल'
मुलींचा जन्मदर कमी होत असल्याबद्दलही अजित पवार यांनी चिंता केली. पण हे सांगत असताना त्यांनी भलतंच उदाहरण दिलं. मुलींचा जन्मदर असाच कमी झाला तर भविष्यात द्रौपदीसारखं करावं लागतंकी काय अशी भीती वाटते असं अजित पवार म्हणालेत. 

अजित पवारांचा डॉक्टरांनाही सल्ला
इंदापुरात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी डॉक्टरांची संवाद साधलाय .यावेळी अजित पवारांनी डॉक्टरांना हसत हसत एक सल्ला दिला. तुमच्याकडे अनेक रुग्ण येतात आणि रुग्ण हा डॉक्टरांशीच खरे बोलतो. त्यामुळे तुम्ही त्यांच्यावरती योग्य उपचार करता. हे करत असताना जरा आमचं विचारा. कसं काय जर त्यांनी आमचं नाव सांगितलं तर त्यांना चांगली वागणूक द्या आणि दुसर नाव घेतलं की असं इंजेक्शन टोचा. असं म्हणतात एकच हशा पिकला त्यावर अजित पवारांनी सावरून घेत सॉरी माफ करा असं म्हटलं.

विरोधकांची टीका
दरम्यान, अजित पवारांच्या या वक्तव्यावर विरोधकांनी सडकून टीका केली आहे. निधीचे पैसे मायबाप जनतेचे आहे त्यामुळे निवडणूकीसाठी जनतेच्या टॅक्सच्या पैशाची प्रलोबने दाखवणे आचारसंहितेचा भंग नाही का असा सवाल अमोल कोल्हे यांनी विचारला आहे. निधी देऊन एखादा रस्ता होईल पण शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळणं गरजेचे आहे. महागाई पासुन त्याची सुटका होणं गरजेचे आहे, रोजगार निर्माण होणं गरजेचे आहे, बेरोजगारी कमी करण्यासाठी धोरणात्मक निर्णय घ्यायला पाहिजे जनतेच्या पैशातला निधी देऊन या धोरणांमध्ये दुरुस्ती होत नाही असं म्हणत अमोल कोल्हेंनी अजित पवारांवर टीका केलीय.