वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू

जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातल्या वढोदा वनक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू झालाय.

Updated: Mar 3, 2018, 12:27 PM IST
वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू title=

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातल्या वढोदा वनक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू झालाय.

६५ वर्षीय लक्ष्मण गणपत जाधव असं या शेतकऱ्याचं नाव असून ते शेतात पाणी द्यायला गेले होते. त्यावेळी त्यांच्यावर वाघानं हल्ला केला... या हल्ल्यात जाधव यांचं अर्ध शरीर निकामी झालं आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. 

या घटनेमुळे, डोलारखेडाच्या जंगलात नरभक्षक वाघाचा संचार असल्याच्या गावकऱ्यांच्या माहितीवर आता शिक्कामोर्तब झालंय.

या हल्ल्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिली.. या वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी गावकऱ्यांनी केलीय. मात्र या घटनेनंतर या परिसरात पट्टेदार वाघाची प्रचंड दहशत पसरलीय.