१२ वर्षात अनेकजण आले आणि गेले - राज ठाकरे

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज १२वा वर्धापन दिन साजरा करण्यात आलाय. यावेळी एका पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. 

Updated: Mar 9, 2018, 01:52 PM IST
१२ वर्षात अनेकजण आले आणि गेले - राज ठाकरे title=

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज १२वा वर्धापन दिन साजरा करण्यात आलाय. यावेळी एका पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. 

‘त्यांना तुडवा’

यावेळी त्यांनी आपल्या मोजक्याच भाषणा सांगितले की, ‘मला जे काही बोलायचे ते मी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात बोलणार आहे’. राज म्हणाले की, ‘१२ वर्षात अनेकजण आले आणि गेले. सभेच्या दिवशी वीज घालवणा-यांना तुडवा’, असा इशाराही राज ठाकरे यांनी अल्प भाषणात दिली. मनसेच्या १२ व्या वर्धापन दिनाचा सोहळा वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात पार पडला. 

गतवर्षी झाला नव्हता मेळावा

मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याला २०१६ पासून सुरूवात करण्यात आली होती. मात्र गेल्यावर्षी चिरंजीव अमित यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे राज ठाकरे यांनी पाडवा मेळावा रद्द केला होता. शिवसेनेच्या दसरा मेळाव्याप्रमाणेच मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याला आता सुरूवात झालीय.