Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे आता 'शिवसेना' आणि 'धनुष्य बाण' चिन्हावर दावा करणार, उचलणार मोठे पाऊल

 Political News : धनुष्यबाण हे चिन्ह आणि शिवसेना ( Shiv Sena) हे नाव हातातून निसटल्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आता मोठं पाऊल उचलले आहे.  (Maharashtra Politics)   

Updated: Feb 18, 2023, 04:42 PM IST
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे आता 'शिवसेना' आणि 'धनुष्य बाण' चिन्हावर दावा करणार, उचलणार मोठे पाऊल title=
Maharashtra Political News

Maharashtra Political News : धनुष्यबाण हे चिन्ह आणि शिवसेना ( Shiv Sena) हे नाव हातातून निसटल्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आता मोठं पाऊल उचलले आहे.  (Maharashtra Politics)  केंद्रीय निवडणूक आयोगाविरोधात ठाकरे आता सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावणार आहेत. ( Maharashtra Political News in Marathi ) 'शिवसेना' आणि  'धनुष्य बाण' चिन्हावर दावा केला जाणार आहे. ( Political News )

निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्यासाठी ठाकरे गटाकडून  सोमवारी याचिका दाखल करण्यात येणार आहे. ठाकरे गटाच्या लिगल टीमने त्यासाठी तयारी केली आहे. निवडणूक आयोगाने दिलेली कारणे कशी चुकीची आहेत, याचा उल्लेख याचिकेत करण्यात येणार आहे, अशी माहिती ठाकरे गटाच्या गोटातून देण्यात आली आहे.

अखेर धनुष्यबाण चिन्हं आणि शिवसेना ठाकरेंच्या हातातून निसटलीय.. कधीच भरुन न निघणारी जखम एकनाथ शिंदेंनी ठाकरेंना दिली.  महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षाचा निकाल लागलाय.. 'धनुष्यबाण' हे चिन्ह आणि 'शिवसेना' हे पक्षाचं नाव ठाकरे कुटुंबाकडून कायमचं निसटले आहे. जे नाव आणि जे चिन्हं ठाकरेंची ओळख होती. ते आता शिंदेंच्या मालकीचं झाले आहे. निवडणूक आयोगानं शिवसेना नाव आणि चिन्हावर निर्णय दिला आणि महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ माजली.

आजवर अनेक नेत्यांनी शिवसेना सोडली. बंड केलं. बाहेरच्यांसोबत घरातूनही बंड झाली. मात्र शिंदेंच्या बंडाने ठाकरेंच्या अस्तित्वावर घाला घातला अन् आता तर शिवसेना नाव आणि शिवसेनेचं चिन्ह धनुष्यबाण ही ओळखच आता ठाकरेकडून हिरावली गेलीय. 

शिवसेनेनं किती बंड पचवली?  

- 1991 मध्ये छगन भुजबळांनी शिवसेना सोडली, त्यांच्यासोबत 6 आमदार फुटले
- 1995 युतीची सत्ता असताना गणेश नाईकांची पर्यावरणमंत्रीपदावर बोळवण, नाराजीतून शिवसेना सोडली
- 2005 मध्ये नारायण राणे यांनी डझनभर आमदारांसह शिवसेना सोडली
- 2006 मध्ये राज ठाकरे यांनी शिवसेना सोडली, राज ठाकरेंसोबत आमदार-खासदार फुटले नाहीत मात्र 2009 च्या निवडणुकीत मनसेचे 13 आमदार निवडून आले

या साऱ्यांची बंड महाराष्ट्रानं पाहिली आणि शिवसेनेनं पचवली.अशा बंडांनंतर शिवसेना संपली नाहीच उलट आधी बाळासाहेबांच्या आणि नंतर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात वाढतच राहिली. सत्तेतही आली. मात्र शिंदेंचं बंड या सर्वांपेक्षा वेगळं होतं. शिंदेंसोबत थोडेथोडके नव्हे तर तब्बल 40 आमदार शिवसेनेतून फुटले. आमदारकी, सरकार वाचवण्याच्या लढाईत शिंदे गटानं थेट शिवसेनेची ओळख असलेल्या नाव आणि चिन्हावर दावा ठोकला.. कायदेशीर लढाईत शिंदेंसमोर उदधव ठाकरे हरले. ज्या बाळासाहेबांनी शिवसेनेला जन्म दिला. त्यांच्याच मुलाच्या हातून शिवसेना कायमची हिरावली गेली. 17 फेब्रुवारी राज्याच्या इतिहासात कायमचा लक्षात ठेवला जाईल.