मनसे-भाजपवर मुख्यमंत्र्याचा हल्लाबोल

भाजप आणि मनसेची छुपी युती असल्याचा आरोप मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय. तर दुसरीकडे गृहमंत्री आर आर पाटील यांनी जोरदार टीका करताना दोघांची औकात दाखवून दया, अशी मतदारांना साद घालताना राज आणि उद्धव ठाकरेंना टोला लगावला.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Apr 3, 2014, 08:42 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
भाजप आणि मनसेची छुपी युती असल्याचा आरोप मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय. तर दुसरीकडे गृहमंत्री आर आर पाटील यांनी जोरदार टीका करताना दोघांची औकात दाखवून दया, अशी मतदारांना साद घालताना राज आणि उद्धव ठाकरेंना टोला लगावला.
भाजपनं २५ वर्षांच्या मैत्रीला विसरून आपला ज्येष्ठ सहकारी असलेल्या शिवसेनेच्या पाठित खंजीर खुपसल्याचा घणाघाती आरोपही मुख्यमंत्र्यांनी रायगडच्या प्रचारसभेत केला. त्यासाठी त्यांनी मनसेला जवळ केलेय. या दोघांमध्ये छुपी युती अाहे. त्यामुळेच हे सर्व चालले आहे, असे म्हणत राज ठाकरे यांना लक्ष्य केलं.
तर दुसरीकडे दोन्ही ठाकरे बंधूना मतदारच आपली औकात दाखवतील, अशी टीका गृहमंत्री आर आर पाटील यांनी जळगावात झी मीडीयाशी बोलताना केलीय. ही देशाची निवडणूक आहे मात्र ठाकरे बंधू एकमेकांची औकात काढून घरघुती भांडणच चव्हाट्यावर आणताहेत यामुळे माध्यमांना मात्र चांगलं खाद्य मिळालंय, अशीही खपली यावेळी आर आर यांनी काढलीय. जळगाव लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादीचे उमेदवार सतीश पाटील यांच्या उमेदवारी अर्ज भरण्याकरिता आर आर पाटील यांनी जळगावात उपस्थिती दिलीय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.