धक्कादायक: भारतात दर अर्धा तासाला एक बलात्कार

भारतात दर अर्ध्या तासाला एक बलात्काराची घटना घडते अशी लाजीरवाणी आकडेवारी समोर आली आहे. गेल्या १३ वर्षात भारतात तब्बल २ लाख ७२ हजार ८४४ बलात्काराचे गुन्हे दाखल झाले असून २००१ च्या तुलनेत २०१३ मध्ये बलात्काराच्या गुन्ह्यांमध्ये तब्बल ५३ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

Updated: Jul 28, 2014, 10:41 AM IST
धक्कादायक: भारतात दर अर्धा तासाला एक बलात्कार title=

नवी दिल्ली: भारतात दर अर्ध्या तासाला एक बलात्काराची घटना घडते अशी लाजीरवाणी आकडेवारी समोर आली आहे. गेल्या १३ वर्षात भारतात तब्बल २ लाख ७२ हजार ८४४ बलात्काराचे गुन्हे दाखल झाले असून २००१ च्या तुलनेत २०१३ मध्ये बलात्काराच्या गुन्ह्यांमध्ये तब्बल ५३ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

कॉमनवेल्थ ह्यूमन राईट्स इनिशिएटीव्ह (सीएचआरआय) तर्फे भारतातील २००१ ते २०१३ या कालावधीतील बलात्काराच्या घटनांवर अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे. भारतातील २८ राज्यांमध्ये या १३ वर्षात २ लाख ६४ हजार १३० बलात्काराच्या घटना घडल्या. यानुसार या राज्यांमध्ये दिवसाला सरासरी ५६ बलात्काराच्या घटना घडतात असं अहवालात म्हटलंय.

तर देशातील सात केंद्रशासीत प्रदेशांमध्ये दिवसाला दोन बलात्काराच्या घटना घडतात. देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत तब्बल ८ हजार ०६० बलात्काराचे गुन्हे दाखल झाले आहेत. 

महाराष्ट्रातही बलात्काराचं प्रमाण वाढल्याचं या अहवालात म्हटलं आहेत. महाराष्ट्रात २००१ मध्ये १,३०२ बलात्काराचे गुन्हे दाखल होते. तर २०१३ मध्ये हेच प्रमाम थेट ३,०६३ पर्यंत पोहोचलं. म्हणजेच राज्यात बलात्काराच्या गुन्ह्यांमध्ये तब्बल १३५ टक्क्यांनी वाढ झाली.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.