'कबीर कला मंच'च्या सचिन माळीसह तिघांना जामीन मंजूर

नक्षलवादी ठरवण्यात आलेल्या 'कबीर कला मंच'च्या तीन कार्यकर्त्यांना अखेर सुप्रीम कोर्टानं दिलासा दिलाय. 

Updated: Jan 3, 2017, 02:09 PM IST
'कबीर कला मंच'च्या सचिन माळीसह तिघांना जामीन मंजूर title=

मुंबई : नक्षलवादी ठरवण्यात आलेल्या 'कबीर कला मंच'च्या तीन कार्यकर्त्यांना अखेर सुप्रीम कोर्टानं दिलासा दिलाय. 

कला मंचच्या सचिन माळीसह तीन जणांना दिलासा सुप्रीम कोर्टानं जामीन मंजूर केलाय. नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचा तिघांवर आरोप करत त्यांना पोलिसांनी अटक केली होती.  
 
गेल्या चार वर्षांपासून सचिन माळी तुरुंगात आहेत. 2013 साली त्यांनी पत्नी शाहीर शीतल साठेसहीत विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं होतं. त्यानंतर काही दिवसांनी शीतल साठे यांना जामीन मंजूर केला होता. 

आज मात्र सचिनसह सागर गोरखे आणि रमेश गायचोर यांचाही जामीन अर्ज मंजूर करण्यात आलाय.