आंध्रात आरक्षणाच्या मुद्यावरून रेल्वे पेटवली

आंध्र प्रदेशात आरक्षण मुद्यावरून रेल्वे पेटवून दिल्याची घटना घडली आहे. कापू समाजाच्या सदस्यांनी मागासवर्गीय प्रवर्गाअंतर्गत आरक्षणाची मागणी केली आहे.  आंदोलनाला रविवारी हिंसक वळण मिळाले. 

Updated: Jan 31, 2016, 11:11 PM IST
आंध्रात आरक्षणाच्या मुद्यावरून रेल्वे पेटवली title=

हैदराबाद : आंध्र प्रदेशात आरक्षण मुद्यावरून रेल्वे पेटवून दिल्याची घटना घडली आहे. कापू समाजाच्या सदस्यांनी मागासवर्गीय प्रवर्गाअंतर्गत आरक्षणाची मागणी केली आहे.  आंदोलनाला रविवारी हिंसक वळण मिळाले. 

आंदोलनकर्त्यांनी पूर्व गोदावरी जिल्ह्यातील टुनी रेल्वे स्थानकावर आलेल्या रत्नांचल एक्स्प्रेसला आग लावली. यात एक्स्प्रेसचे ४ डबे जळून खाक झाले. 

आंदोलनकर्त्यांनी एक्स्प्रेसला आग लावण्याआधीच डब्यातील प्रवाशांना बाहेर काढण्यात आल्यामुळे अनर्थ टळला. या आंदोलनामुळे विजयवाडा आणि विशाखापट्टणमदरम्यानची रेल्वे वाहतूक ठप्प पडली.