आबांविषयी अण्णा हजारेंची प्रतिक्रिया

महाराष्ट्राच्या समाजाची देशाची मोठी हानी झाली आहे. एक आदर्श उपमुख्यमंत्री कसा असावा त्यांनी हा आदर्श घालून दिला, असं ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे.

Updated: Feb 16, 2015, 05:56 PM IST
आबांविषयी अण्णा हजारेंची प्रतिक्रिया title=

राळेगणसिद्धी : महाराष्ट्राच्या समाजाची देशाची मोठी हानी झाली आहे. एक आदर्श उपमुख्यमंत्री कसा असावा त्यांनी हा आदर्श घालून दिला, असं ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे.

"एक आदर्श सरपंच ते मुख्यमंत्री कसा असावा?, हे आर.आर.पाटलांनी त्यांना दाखवून दिलं.
ग्रामविकास मंत्री असतांना आमच्या अनेक वेळा बैठका व्हायच्या, ग्रामसभा, दफ्तर दिरंगाई असे अनेक कायदे केले, अडचणी होत्या, पण त्यांनी कायदे केले", असं अण्णांनी म्हटलंय. 

"आबांनी सर्वसामान्यांची सेवा केली. त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो", अशी प्रतिक्रिया अण्णा हजारे यांनी दिली आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.