'जनतेच्या मनातल्या मुख्यमंत्री मंत्र्यांचे फोन घेत नाहीत'

गोपीनाथ मुंडे लोकांमध्ये असायचे आणि पंकजा म्हणते मी, जनतेच्या मनातली मुख्यमंत्री. 

Updated: Feb 13, 2017, 06:44 PM IST
'जनतेच्या मनातल्या मुख्यमंत्री मंत्र्यांचे फोन घेत नाहीत' title=

बीड : गोपीनाथ मुंडे लोकांमध्ये असायचे आणि पंकजा म्हणते मी, जनतेच्या मनातली मुख्यमंत्री. ही मंत्र्यांचे फोन घेत नाही जनतेचे कधी घेणार. म्हणून पंकजा ताई मी पण आहे भाई असे म्हणत, पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी पंकजा मुंडेंवर बोचरी टीका केली आहे. पंकजा मुंडे या कधीच जमिनीवर नसतात असंही कदम म्हणालेत.

विश्वासघात हे खातं भाजपाकडे आहे. शिवसेना विश्वासघात करत नाही. फडणवीस बिहारचे मुख्यमंत्री नसून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात गुंडांची भाषा बोलू नका असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. बीडमधील गेवराईमधील प्रचारसभेत त्यांनी मुख्यमंत्री आणि पंकजा मुंडेंना टीकेचं लक्ष्य केलं.