नागपूरमध्ये तिघा भावांची तलवारीने हत्या

येथील नंदनवन भागातील भांडे प्लॉट परिसरात धक्कादायक घटना घडले. तीन सख्या भावांची हत्या करण्यात आली आहे.

Updated: Apr 10, 2015, 09:15 AM IST
नागपूरमध्ये तिघा भावांची तलवारीने हत्या title=

नागपूर : येथील नंदनवन भागातील भांडे प्लॉट परिसरात धक्कादायक घटना घडले. तीन सख्या भावांची हत्या करण्यात आली आहे.

केशव उगले, एकनाथ उगले, संजय उगले अशी या तीन भावांची नावं आहेत. शक्ती पांडे या व्यक्तीकडे मुंजच्या कार्यक्रमाला हे तिघे भाऊ गेले असता. रामा नागोसे आणि शुभम सातपैसे यांचा या तिघांशी वाद झाला होता. या वादातून हमरातूमरी झाली. हा वाद विकोपाला गेला.

वादानंतर ५ ते ६ मारेक-यांनी या तिघांवर तलवारीने हल्ला चढवला. या हल्यात गंभीर जखमी झालेल्या तिघांचा मृत्यू झाला. या हत्याप्रकरणी रामा नागोसे आणि भूषण मांजरे या दोघांना अटक केरण्यात आली आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.