सहा तासानंतर रेल्वे प्रवाशांचा उद्रेक शांत

रेल्वेच्या खोळंब्यामुळे बदलापूरमध्ये प्रवाशांनी सुरु केलेलं उत्स्फूर्त आंदोलन सहा तासानंतर मागे घेण्यात आलं.

Updated: Aug 12, 2016, 11:39 AM IST
सहा तासानंतर रेल्वे प्रवाशांचा उद्रेक शांत title=

बदलापूर : रेल्वेच्या खोळंब्यामुळे बदलापूरमध्ये प्रवाशांनी सुरु केलेलं उत्स्फूर्त आंदोलन सहा तासानंतर मागे घेण्यात आलं. सकाळी 10 वाजून 55 मिनिटांनी हे आंदोलन मागे घेण्यात आलं. प्रवाशांनी आंदोलन मागे घेतल्यानंतर अखेर लोकल वाहतूक सुरु झाली आहे. 

प्रवाशांच्या या आंदोलनामुळे मात्र मध्य रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं आहे. ऐन गर्दीच्या वेळेस ही घटना घडल्याने कामावर जाणाऱ्या प्रवाशांचे चांगलेच हाल झाले. अनेक स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी जमा झाली होती.