सांडपाण्यावरुन मुंबई पालिकेला उच्च न्यायालयाने फटकारले

मान्सूनमध्ये मुंबईतल्या सांडपाण्याच्या व्यवस्थेवरून मुंबई हायकोर्टाने पालिका प्रशासन आणि एमएमआरडीएला फटकारले.

Updated: Sep 22, 2016, 10:17 PM IST
सांडपाण्यावरुन मुंबई पालिकेला उच्च न्यायालयाने फटकारले title=

मुंबई : मान्सूनमध्ये मुंबईतल्या सांडपाण्याच्या व्यवस्थेवरून मुंबई हायकोर्टाने पालिका प्रशासन आणि एमएमआरडीएला फटकारले.

मान्सून काळात मुंबईतील सांडपाण्याची अवस्था भयावह असते, रस्त्यांवर आणि गटारांत पाणी साचल्यामुळे साथीच्या रोगांना निंमत्रण मिळते असं मत नोंदवत या समस्यांबाबत पालिका आणि एमएमआरडीएनं एकत्रित काम करावे असे आदेश हायकोर्टाने दिले आहेत. 

याप्रकरणी अटलबिहारी दुबे यांनी जनहित याचिका दाखल केलीय त्यावर सुनावणी करताना हायकोर्टाने हे आदेश दिले आहेत.