टीम इंडियाच्या यशासाठी देशभरात प्रार्थना

टीम इंडियाच्या यशासाठी देशभरात प्रार्थना करण्यात येत आहेत.  मंदिरांमध्ये पूजा आणि यज्ञ केले जातायत. मशिदीं-दरग्यांमध्ये विजयासाठी नमाज अदा केला जातोय. गुरूद्वारांमध्येही क्रिकेट फॅन्सनी प्रार्थना केल्यात. 

Updated: Mar 26, 2015, 02:00 PM IST
टीम इंडियाच्या यशासाठी देशभरात प्रार्थना  title=

मुंबई : टीम इंडियाच्या यशासाठी देशभरात प्रार्थना करण्यात येत आहेत.  मंदिरांमध्ये पूजा आणि यज्ञ केले जातायत. मशिदीं-दरग्यांमध्ये विजयासाठी नमाज अदा केला जातोय. गुरूद्वारांमध्येही क्रिकेट फॅन्सनी प्रार्थना केल्यात. 

संपूर्ण देश टीम इंडियासाठी प्रार्थना करतोय. आणि यामध्ये भारतीय टीममधील क्रिकेटपटूंचे  कुटुंबीयही मागे राहिलेली नाही. मोहम्मद शमीसाठी त्याच्या कुटुंबीयांनी खास नमाज अदा केला. तर रवींद्र जाडेजाच्या घरीही त्याच्या बहिणीने प्रार्थना केली. टीम इंडियाच्या यशासाठी देशात सगळीकडे प्रार्थना होतेय. मुंबईमध्ये सकाळीच टीमच्या विजयासाठी यज्ञ करण्यात आला. 

दुसऱ्या सेमीफायनलमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात जोरदार टक्कर होत आहे. भारताने आतापर्यंतचे सर्व सामने जिंकले आहेत. तसेच रनरेटही चांगले आहे. त्या तुलनेत ऑस्ट्रेलिया भारताच्या मागे आहे.

ऑस्ट्रेलियाने याआधी टॉस जिंकला आहे.  एकदा नाही तर १० वेळा. मात्र, दोनवेळाच त्यांना विजय संपादन करता आला आहे. आकड्यांचा विचार केला तर ८ वेळी टॉस जिंकणारी टीम हरली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्डकप सेमीफायनल रंगणार आहे. या सामन्याची खूपच उत्सुकता लागली आहे. विश्वविजेता भारत ऑस्ट्रेलियाला नमवून पुन्हा एकदा वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात धडक मारेल, अशी आशा सर्व भारतीय क्रिकेटचाहते करत आहेत.  

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.