बांग्लादेश दौरा : कसोटी सामन्यासाठी टीम इंडिया ढाक्यात दाखल

बांग्लादेश विरूद्धच्या एकमेव कसोटी सामन्यासाठी कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली टीम इंडिया बांग्लादेशमध्ये दाखल झाली आहे.

Updated: Jun 8, 2015, 02:03 PM IST
बांग्लादेश दौरा : कसोटी सामन्यासाठी टीम इंडिया ढाक्यात दाखल title=

मुंबई : बांग्लादेश विरूद्धच्या एकमेव कसोटी सामन्यासाठी कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली टीम इंडिया बांग्लादेशमध्ये दाखल झाली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बांग्लादेश दौऱ्यानंतर लगेच सोमवारी सकाळी टीम इंडिया बांग्लादेशकडे रवाना झाली.

टीम इंडिया १० जूनपासून फतुल्लाहमध्ये एकमेव कसोटी सामना खेळेल.

दौऱ्यावर निघण्यापूर्वी कर्णधार विराट कोहली म्हणाला की, ही वेळ शिकण्याची नसून जिंकण्याची आहे.

दुसरीकडे टीम इंडियाचे संचालक रवि शास्त्री यांनी स्पष्ट केलंय की बांग्लादेश दौऱ्यासाठी टीम इंडियाला कोणत्या प्रशिक्षकाची आवश्यकता नाही, पण जर गरज पडलीच तर ते स्वत: प्रशिक्षकाची भूमिका बजावतील.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.