मुंबई-गोवा महामार्गावरील अपघातात ४ ठार

मुंबई-गोवा महामार्गावर अपघातांची मालिका सुरुच आहे. लक्झरी बस आणि ट्रकची समोरसमोर धडक होऊन ४ प्रवासी ठार तर १३ जण जखमी झालेत.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jul 13, 2013, 12:33 PM IST

www.24taas.com, झी मीडिया,अलिबाग
मुंबई-गोवा महामार्गावर अपघातांची मालिका सुरुच आहे. लक्झरी बस आणि ट्रकची समोरसमोर धडक होऊन ४ प्रवासी ठार तर १३ जण जखमी झालेत.
रायगड जिल्ह्यातील टोळ फाट्याजवळ रात्री हा अपघात झाला. जखमींना महाडच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. या अपघातामुळे मुंबई-गोवा महामार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली आहे.
मृतांमध्ये ट्रकचालक आणि बसमधील प्रवाशांचाही समावेश आहे. लक्झरी बस मुंबईहून कोकणाकडे निघाली होती.

मुंबई-गोवा महामार्ग मृत्यूचा सापळा बनलाय. हा महामार्ग चौपदरी करण्याची गेल्या कित्येक दिवसांची मागणी आहे. पण, आणखी किती बळी जाण्याची सरकार वाट बघतंय, असा प्रश्न आता निर्माण झालाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.