'या' राशींच्या व्यक्तींनी कधीही पायात घालू नका काळा धागा

काळा धागा बांधताना कोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे, वाचा...  

Updated: Sep 18, 2022, 01:19 PM IST
 'या' राशींच्या व्यक्तींनी कधीही पायात घालू नका काळा धागा title=

मुंबई : बहुतेक लोक त्यांच्या मनगटावर किंवा पायावर काळा धागा बांधतात. काही लोक ते चांगले दिसण्यासाठी वापरतात, तर काही लोक वाईट नजर टाळण्यासाठी वापरतात. ज्योतिषी मानतात की काळा रंग वाईट नजर किंवा वाईट शक्तींपासून संरक्षण करतो. असे मानले जाते की जेव्हा एखादी व्यक्ती वाईट नजरेने एखाद्याकडे पाहते तेव्हा त्यापासून बचावासाठी काळ्या रंगाचा वापर केला जातो. 

असेही मानले जाते की काळा धागा पाहणाऱ्यांचे लक्ष विचलित करतो. ज्यामुळे व्यक्ती वाईट प्रभावापासून वाचते. परंतु प्रत्येकाने काळा धागा घालू नये. ज्योतिषशास्त्रानुसार एकूण दोन राशीच्या लोकांनी काळा धागा घालू नये. या मागचे मुख्य कारण जाणून घ्या.

या दोन राशींच्या लोकांनी काळा धागा बांधू नये.
वृश्चिक (Scorpio)

असे मानले जाते की, मंगळ ग्रहावर वृश्चिक राशीचे राज्य आहे. धार्मिक मान्यतेनुसार मंगळ ग्रहाला मंगल देव असेही म्हणतात. मंगळ ग्रहाचं काळ्या रंगाशी वैर आहे. या कारणास्तव, या राशीच्या लोकांना काळा धागा न घालण्याचा सल्ला दिला जातो.

मेष (Aries)
वृश्चिक राशीप्रमाणे मेष राशीचा स्वामी देखील मंगळ आहे. काळ्या रंगाने मंगळाचा राग येतो, त्यामुळे मेष राशीच्या लोकांनीही हातात, पायात किंवा शरीरावर कुठेही काळा धागा बांधू नये. इतकेच नाही तर असे मानले जाते की, या राशीच्या लोकांनी काळा धागा घातल्यास जीवनातील समस्या अनेक पटींनी वाढू शकतात.

कोणत्या राशीचे लोक काळा धागा बांधू शकतात
तूळ आणि कुंभ राशीच्या लोकांसाठी काळा धागा घालणे शुभ असते. कारण कुंभ आणि तुला राशीवर शनीचा प्रभाव आहे. तूळ आणि कुंभ राशीच्या लोकांना काळा धागा बांधल्याने जीवनात प्रगती होते. तसेच, तुम्हाला पैशाशी संबंधित समस्येचा सामना करावा लागणार नाही.

(विशेष सूचना:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही.)