IND vs ENG 3rd ODI: पंड्या-पंतची 50-50, टीम इंडियाचा डाव सावरला

टीम इंडियाचा डाव सावरला 

Updated: Jul 17, 2022, 10:04 PM IST
IND vs ENG 3rd ODI: पंड्या-पंतची 50-50, टीम इंडियाचा डाव सावरला  title=

मँचेस्टर : इंग्लंडने दिलेल्या 259 धावांचा पाठलाग करायला उतरलेल्या टीम इंडियाचा डाव सुरुवातीलाच चांगलाच गडगडला होता. मात्र हार्दिक पंड्या आणि रिषभ पंतने डाव सावरत अर्धशतक ठोकले आहे. त्यामुळे टीम इंडीयाचा डाव सावरला असून तिसरा सामन्याचा विजयाकडे धाव सुरु झाली आहे. 

तिसऱ्या वनडे सामन्यात इंग्लंडने 259 धावा ठोकल्या आहेत. या धावांचा पाठलाग करायला उतरलेल्या टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली नाही. शिखर धवन 1 आणि रोहित शर्मा 17 धावांवर बाद झाला. दोन्ही सलामीवीरांची झटपट विकेट पडल्यानंतर विराट कोहली 17 धावांवर तो बाद झाला. सुर्यकु्मार 16 धावावर बाद झाला. यानंतर मैदानावर उतरलेल्या रिषभ पंत आणि हार्दिक पंड्याने डाव सावरला आहे.  हार्दिक पंड्या आणि रिषभने अर्धशतक ठोकलं आहे. या दोघांच्या खेळीने टीम इंडियाचा डाव सावरला आहे. 

टीम इंडीया 4 बाद 152 धावांवर पोहोचला आहे. तर आता निव्वळ 108 धावा विजयापासून दुर आहे..