कोहलीच्या शतकानंतर भारताचा डाव घोषित

श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्ये विराट कोहलीनं शतक झळकावलं आहे.

Updated: Jul 29, 2017, 12:02 PM IST
कोहलीच्या शतकानंतर भारताचा डाव घोषित title=

कोलंबो : श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्ये विराट कोहलीनं शतक झळकावलं आहे. टेस्ट क्रिकेटमधलं विराटचं हे १७वं शतक आहे. विराट कोहलीच्या शतकानंतर भारतानं लगेचच डाव घोषित केला. चौथ्या दिवसाची सुरुवात १८९/३ अशी केल्यानंतर भारतानं सकाळी २४०/३ पर्यंत मजल मारली. यामुळे श्रीलंकेला विजयासाठी तब्बल ५५० रन्सची आवश्यकता असणार आहे. 

विराट कोहलीच्या १३६ बॉल्समध्ये केलेल्या नाबाद १०३ रन्समध्ये ५ फोर आणि एका सिक्सचा समावेश होता. तर अजिंक्य रहाणेनं १८ बॉल्समध्ये नाबाद २३ रन्स बनवल्या. तर काल अभिनव मुकुंदनं ८१ रन्सची खेळी केली. विराट कोहली आणि अभिनव मुकुंदनं तिस-या विकेटसाठी 133 रन्सची पार्टनरशिप केली.

तत्पूर्वी, टीम इंडियानं लंकन टीमला पहिल्या इनिंगमध्ये 291 रन्सवर गुंडाळण्यात यश आलं. रवींद्र जाडेजानं भारताकडून सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या.