निवडणूक आयोग

`राजकारणी आणि पक्षाला निवडणूक आयोग घाबरत नाही`

मुख्य निवडणूक आयुक्त यांनी निवडणूक आयोगावर झालेल्या टीकेवर मोजक्या शब्दात उत्तर दिलं आहे.

May 8, 2014, 05:26 PM IST

बीएचयू बाहेरील भाजपचा ‘सत्याग्रह’ संपला

भाजप नेते अमित शाह आणि अरुण जेटली यांच्या नेतृत्वात वाराणसीमध्ये सुरू असलेला भाजप कार्यकर्त्यांचा सत्याग्रह संपलाय. बनारस हिंदू यूनिव्हर्सिटीच्या बाहेर भाजपचे नेते आंदोलन करत होते. नरेंद्र मोदींच्या रॅलीसाठी निवडणूक आयोगानं नकार दिल्यानं भाजपचं हे आंदोलन सुरू होतं.

May 8, 2014, 03:48 PM IST

वाराणसीत निवडणूक आयोगाविरोधात भाजपचा ‘सत्याग्रह’ सुरू

वाराणसीतल्या मोदींच्या सभेला परवानगी नाकारण्यात आल्यामुळं भाजप कार्यकर्त्यांनी वाराणसीमध्ये धरणं आंदोलन करतायत. तर दिल्लीमध्ये निवडणूक आयोगावर न्यायमार्च काढण्यात आलाय.

May 8, 2014, 01:28 PM IST

आरती शक्य नाही, गंगा माते माफ कर - नरेंद्र मोदी

भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आज वाराणसीत जात आहेत. मात्र, मोदी तिथून बारा किमी दूर असलेल्या जगतपूरमध्ये सभा घेणार आहेत.

May 8, 2014, 09:43 AM IST

नरेंद्र मोदींना अटक करा, तृणमूल काँग्रेसची मागणी

आचार संहितेचा भंग केल्याप्रकरणी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींच्या अटकेची मागणी तृणमूल काँग्रेस पक्षानं केली आहे. जातीच्या नावावर मतं मागितल्याचा आरोप करत तृणमूल काँग्रेस पक्षानं मोदींविरोधात अटकेची मागणी करणारं पत्र निवडणूक आयोगाला पाठविलंय.

May 5, 2014, 10:20 PM IST

मोदींविरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश

भाजप पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी पत्रकार परिषदेत कमळ हातात घेतले खरे, पण हेच कमळ त्यांना अडचणीचे ठरले आहे. कमळ हातात घेऊन हातवारे करत माहिती देण्याचा प्रयत्न केला. हा आचारसंहितेचा भंग असल्याची तक्रार काँग्रेसने केली. त्यानंतर निवडणूक आयोगाने कारवाई करण्याचे आदेश दिले.

Apr 30, 2014, 02:33 PM IST

`कमळ` झळकावल्यानं मोदींविरोधात काँग्रेसची तक्रार

कालपर्यंत सूटवर लावलेलं कमळ आज मोदींनी हातात घेतलं. मतदानाचा हक्क बजावल्यानंतर मोदींनी कमळ हातात घेऊन पत्रकार परिषद घेतली. मोदीचं हेच कमळ हातात घेणं काँग्रेसला आक्षेपार्ह वाटलंय. काँग्रेसनं मोदींविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केलीय. मोदींची उमेदवारी रद्द करण्याची मागणी काँग्रेसनं केलीय.

Apr 30, 2014, 12:01 PM IST

पाहा, मतदार यादीतून कशी वगळली मुंबईकरांची नावं...

गुरुवारी मुंबईत लोकसभा निवडणुकीसाठीच्या मतदानावेळी हजारो जणांची नावं नसल्याचा घोळ समोर आला असला तरी मतदार यादीतून नाव वगळण्याची प्रक्रिया निवडणूक आयोगानं २०१२ पासूनच सुरु केली होती.

Apr 25, 2014, 10:02 PM IST

मतदार यादीत नाव नाही, मतदान करताच येणार नाही

मुख्य यादीत नाव नसलेल्यांना मतदान करता येणार नाही, असं मुंबई उपनगर जिल्हाधिकारी शेखर चन्ने यांनी स्पष्ट केलंय.

Apr 23, 2014, 06:52 PM IST

शिवसेना नेते रामदास कदमांविरोधात FIR

सभेदरम्यान वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी शिवसेना नेते रामदास कदम यांच्याविरोधात निवडणूक अधिकाऱ्यांनी एफआयआर दाखल केला आहे. मुंबईतील बीकेसी पोलीस स्टेशनमध्ये अधिकाऱ्यांनी हा गुन्हा नोंदविला आहे.

Apr 23, 2014, 06:01 PM IST

गिरीराज सिंहांना वादग्रस्त विधान भोवलं, प्रचारावर बंदी

वादग्रस्त वक्तव्य केल्या प्रकरणी भाजप नेते गिरीराज सिंग यांच्यावर निवडणूक आयोगानं निर्बंध लादलेत. त्यांना बिहार आणि झारखंडमध्ये प्रचारास बंदी घालण्यात आली असून याबाबतचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेत. तसंच त्यांना स्वतंत्र कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलीये.

Apr 22, 2014, 10:34 PM IST

ऑफिसमधून पाहा, तुमचं नाव मतदार यादीत आहे?

मुंबईकरांनो मतदार यादीत तुमचं नाव आहे का? हे तुम्हाला ऑफिसमधून बसूनच पाहता येणार आहे. मतदार यादीत तुमचं नाव आहे किंवा नाही, याची खातरजमा करणे महत्वाचे आहे.

Apr 21, 2014, 11:30 AM IST

खबरदार, मतदान करताना `सेल्फी` काढलात तर...

मतदान करताना तुम्ही जर तुमचा `सेल्फी` काढण्याच्या विचारात असाल तर सावधान...

Apr 19, 2014, 04:03 PM IST

बप्पी लहरींपेक्षा त्यांच्या बायकोकडे अधिक सोने

सोने आणि बप्पी लहरी यांचे प्रेम आपण सर्वजण जाणतो. नेहमी सोन्याच्या मोठ-मोठ्या चेन गळ्यात घालणारे बप्पीदा मात्र सोन्याच्याबाबतीत आपल्या पत्नीपेक्षा गरीब आहेत. बप्पीदांकड़े सुमारे १२ कोटी रुपयांची स्थावर आणि जंगम मालमत्ता आहे. तसेच बीएमडब्ल्यू आणि ऑडीसह पाच कारचे मालक आहेत.

Apr 11, 2014, 01:16 PM IST

महिलांनी मोदींवर आता विश्वास कसा ठेवायचा - दिग्विजय सिंह

भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी बुधवारी निवडणूक आयोगासमोर आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आणि त्यात आपलं लग्न झालं असल्याचं नमूद केलं. पहिल्यांदाच जशोदाबेन आपली पत्नी असल्याचं मोदींनी सांगितलंय. त्यांच्या या माहितीनंतर काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी ट्विटरवरून टिका केलीय. दिग्विजय सिंह म्हणाले, की "मोदींच्या या कबुलीनंतर देशातील महिला काय मोदींवर विश्वास ठेवू शकतील".

Apr 10, 2014, 12:26 PM IST