Google Doodle: गुगलने जागवल्या दिलीप सरदेसाईंच्या आठवणी

विदेशात द्विशतक झळकावणारा पहिला भारतीय क्रिकेटपटू म्हणून सरदेसाई यांना ओळखले जाते.

Updated: Aug 8, 2018, 08:48 AM IST
Google Doodle: गुगलने जागवल्या दिलीप सरदेसाईंच्या आठवणी title=

मुंबई: भारताचे महान क्रिकेटपटू दिलीप सरदेसाई यांच्या ७८व्या जयंतीनिमीत्त गुगलने त्यांच्या आठवणी जागवल्या आहेत. गुगल हे इंटरनेट विश्वातील सर्वात मोठे सर्ज इंजिन आहे. गुगलने खास डूडल बूनवून सरदेसाई यांना श्रद्धांजली वाहीली आहे. १९७१मध्ये सरदेसाई यांनी भारतीय क्रिकेटला एक वेगळे वळण दिले. तसेच, त्या काळात बलाढ्य समजल्या जाणाऱ्या इग्लंड आणि वेस्ट इंडिज सारख्या संघाला त्यांच्याच मैदानावर पराभूत करण्याचीही खेळी करायलाही भारताने सरदेसाईंच्या काळातच सुरूवात केली.

गोव्याचे पहिले क्रिकेटर

आठ ऑगस्ट १९४०मध्ये गोव्यामध्ये जन्मलेल्या सरदेसाईंनी क्रिकेटमध्ये नाव कमावले. विदेशात द्विशतक झळकावणारा पहिला भारतीय क्रिकेटपटू म्हणून सरदेसाई यांना ओळखले जाते. सरदेसाई यांचे पूत्र आणि सुप्रसिद्ध पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी एका मुलाखतीदरम्यान, म्हटले होते की, 'आपले वडील वयाच्या १७व्या वर्षांपर्यंतच्या आयुष्यात कधीही टर्फ विकेटवर खेळले नाहीत. त्यांच्या उदयापर्यंत गोव्यातून असा एकही क्रिकेटर पुढे आला नव्हता जो भारताच्या आंतरराष्ट्रीय संघाचा घटक बनला'. सरदेसाई यांनी भारतीय संघाकडून ३० टेस्ट सामने खेळले. दुहेरी शतकासह सुमारे ५ शतके त्यांच्या नावावर आहेत. विजय मर्चंड यांनी त्यांना 'द रेनासांस मॅन ऑफ इंडिया' म्हणून गौरवले. महत्त्वाचे असे की ज्या काळात आंतरराष्ट्रय सामने मोठ्या प्रमाणावर खेळले जात नसत. त्या काळात त्यांनी ही कामगिरी केली आहे. डावखूरा फलंदाज असलेले सरदेसाई एक उत्कृष्ट गोलंदाजही होते. १९७२मध्ये त्यांनी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. त्यांची आणखी एक खासीयत अशी की आपल्य एकूण कारकिर्दीत त्यांनी केवळ दोनच षटकार ठोकले. त्यांनी १९६१मध्ये आपल्या क्रिकेट करिअरची सुरूवात केली.  

रोमँटीक आठवणी

दिलीप सरदेसाई हे बडोद्यात राहणारी आपली गर्लफ्रेंड नंदिनी पंत हिला दररोज एक पत्र लिहीत असत. कालांतराने दोघांनी लग्न केले. त्या एक प्रसिद्ध समाजशास्त्रज्ञ होत्या. नंदिनी पुढे सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षाही झाल्या. नंदिनी यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की त्यांना एकमेकांना सुमारे १०० पत्रं लिहीली.विशेष म्हणजे त्यांनी एकमेकांना पत्राच्या रुपातच ओळखले.