या आरोग्यदायी फायद्यांसाठी करा उपवास!

‘उपवास’ हा भारतीय संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग मानला जातो.

health.india.com | Updated: Sep 9, 2017, 12:55 PM IST
या आरोग्यदायी फायद्यांसाठी करा उपवास!  title=

मुंबई : ‘उपवास’ हा भारतीय संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग मानला जातो.

विविध सणावारांना किंवा अगदी काहीजण  आठवड्यातून किमान एकदा उपवास करतात. धार्मिक कारणासोबतच उपवास करण्याचे काही आरोग्यदायी फायदेदेखील आहेत. त्यामुळे आहाराचे पथ्यपाणी आणि आरोग्याकडे पुरेसे लक्ष देऊन उपवास केल्यास या ‘4’ कारणांसाठी उपवास करणं फायदेशीर ठरू शकतं ..  

डीटॉक्सिफिकेशन – आयुर्वेदानुसारही अनेक आजारांचं मूळ हे शरीरात साचून राहणारे घातक/विषारी घटक हे आहे. त्यामुळे उपवास केल्याने पोटाला आराम मिळतो आणि घातक घटक  बाहेर पडण्यास मदत होते.

पचनसंस्थेचे कार्य सुधारते – फळं आणि हलका आहार घेऊन उपवास केल्यास पचनकार्यालाही चालना मिळते. पचनसंस्थेवर आलेला दाब थोड्या प्रमाणात हलका करण्यास मदत होते.

मन शांत होते –  वातावरणाचा,गुरूत्वाकर्षणाचा मानवी शरीरावर परिणाम होतो. त्यातूनच मूड स्विंग्स तयार होतात. मानसिक ताणतणाव वाढला की चिडचिड, मत्सर यासारख्या भावनाही वाढतात. उपवास केल्याने पोटात अ‍ॅसिड बिल्डअप वाढतो. त्यामुळे अनेक अनेक समस्यांवर नियंत्रण ठेवणं सुकर होते.

उर्जा मिळते –  शरीर आणि मन डिटॉक्स झाल्यानंतर त्यामधून शरीरालाही उर्जा मिळते. अधिक प्रसन्न आणि रिफ्रेशिंग वाटते. 

उपवास करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी ?

उपवास करताना आहाराचं, व्यायामाचं आणि आरोग्याचं गणित सांभाळा. खूप थकवणारे व्यायाम, कामं टाळा. खूप तेलकट किंवा सतत खातं राहणं टाळा. त्याऐवजी राजगिरा थालिपीठ, फळं असा हलका आहार घ्या. यामुळे पचनकार्यावर भार येणार  नाही. खाण्यासोबतच मुबलक पाणी किंवा लस्सी, ताक यासारखे पेययुक्त पदार्थ आहारात ठेवा.