"दौरे करणं टाळायला हवं” शरद पवारांच्या आवाहनावर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

पूरग्रस्त भागात नेत्यांनी दौरे करु नये, त्यामुळे यंत्रणेचं लक्ष बचावकार्यातून विचलित होतं, असं आवाहन शरद पवारांनी (Sharad Pawar) केलं होतं.

Updated: Jul 27, 2021, 03:50 PM IST
"दौरे करणं टाळायला हवं” शरद पवारांच्या आवाहनावर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?  title=

पुणे : "मला असं वाटतं की पवार साहेबांनी जे काही आवाहन केलंय, त्याचा अर्थ आपण एवढाच समजून घ्यायला पाहिजे की, दौरे करताना जे दौरे करणारे आहेत, त्यांनी इतकं लक्षात घ्यायला हवं की, त्यांच्या दौऱ्याचा ताण हा शासकीय यंत्रणेवर येऊ नये", अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस  (Devendra Fadnavis) यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar)  यांनी केलेल्या आवाहनावर दिली आहे. फडणवीस पत्रकारांशी संवाद साधत होते. यावेळेस त्यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली. तसेच त्यांनी विविध मुद्द्यांवरही भाष्य केलं. (Devendra Fadnavis reaction on the Sharad Pawar appeal that leaders should avoided visit in flooded areas)

फडणवीस काय म्हणाले? 

"मी विरोधी पक्षनेता आहे. आम्ही जातो तेव्हा शासकीय यंत्रणा फारशी तिथे नसतेच, कारण सरकारने जीआरच काढला आहे. आम्ही दौऱ्यावर गेल्याने शासकीय यंत्रणा जागी होते. यंत्रणा कामाला लागते. दौऱ्यावर गेल्याने लोकांचा आक्रोश समजून घेता येतो, अन तो सरकारपर्यंत पोहचवायला मदत होते", असंही फडणवीस यांनी नमूद केलं.  

त्यामुळे आपण पवार साहेबांच्या विधानाचा इतकाच अर्थ घेतला पाहिजे की, रेस्क्यू ऑपरेशन चालंलय ते आपल्या दौऱ्याने थांबू नये. पवार साहेबांच म्हणंन योग्य आहे. बाकी विरोधी पक्षनेता म्हणून जो दौरा करण्याची आवश्यकता आहे, ते मी करणारचं", असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

शरद पवार काय म्हणाले होते? 

"पूरग्रस्त भागात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेत्यांनी दौरे केले. त्यांचे दौरे लोकांना धीर देण्यास उपयोगी पडतात. त्यामुळे या नेत्यांच्या दौऱ्यावर आमची हरकत नाही. पण मला वाटतं की, ज्यांच्यावर जबाबदारी आहे, त्यांनी दौरे करुन कामात लक्ष द्यायला हवं. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यांचं मी स्वागत करतो.  ती त्यांची जबाबदारी आहे. माझ्यासारखे नेते गेल्यास तिथं शासकीय यंत्रणेवर दबाव येतो. त्याचं लक्ष बचावकार्यातून विचलित होतं, यामुळे इतर नेत्यांनीही दौरे करायला नको", असं आवाहन शरद पवारांनी केलं होतं. ते मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.