हिंगणघाट जळीत प्रकरणात आरोपीवर हत्येचा गुन्हा

हिंगणघाट येथील जळीतकांड प्रकरणात पीडितेचा मृत्यू झाल्याने हत्येचे कलम वाढवल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली. आरोपी विकेश ऊर्फ विक्की नगराळे हा सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. 

Updated: Feb 11, 2020, 11:19 PM IST
हिंगणघाट जळीत प्रकरणात आरोपीवर हत्येचा गुन्हा title=

वर्धा : हिंगणघाट येथील जळीतकांड प्रकरणात पीडितेचा मृत्यू झाल्याने हत्येचे कलम वाढवल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली. आरोपी विकेश ऊर्फ विक्की नगराळे हा सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. या प्रकरणाचा तपास जलदगतीने सुरु असून प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची तयारी प्रशासनाकडून केली जात आहे. एवढेच नव्हे तर आरोपीला कठोर शिक्षा व्हावी याकरिता ज्येष्ठ विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांची नियुक्ती  करण्यात आली आहे. दरम्यान, पीडितेच्या दारोडा या गावात स्मशान शांतता पाहावयास मिळाली. अंत्यसंस्कारवेळी नागरिकांनी मोठा संताप व्यक्त केला होता. पोलिसांवर दगडफेक करण्यात आली होती.

हिंगणघाट जाळीतकांड प्रकरणी कलम ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. आता लवकरच आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे. दरम्यान, गावात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त कायम ठेवण्यात आला आहे. हिंगणघाट येथील जळीतकांड प्रकरणाच्या पीडितेचा सोमवारी दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर सगळीकडे संतापाची लाट पाहावयास मिळाली. या घटनेतील आरोपीवर सुरवातीला हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल होता. आता पीडितेचा मृत्यू झाल्याने कलमात वाढ करत हत्येची कलम वाढवल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली. आधीच्याच नोंदविलेल्या गुन्ह्यात वाढ करण्यात आली आहे.

या घटनेतील आरोपी विकेश ऊर्फ विक्की नगराळे हा सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. या प्रकरणाचा तपास जलदगतीने सुरु असून प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची तयारी प्रशासनाकडून केली जात आहे.एवढंच नव्हे तर आरोपीला कठोर शिक्षा व्हावी याकरिता सरकारकडून उज्वल निकम यांची नियुक्ती सुद्धा करण्यात आली आहे. पिडितेच्या दरोडा या गावात आज स्मशान शांतता पहावयास मिळाली. सोमवारी याच गावात अंत्यसंस्कारवेळी नागरिकांनी मोठा संताप व्यक्त केला होता. 

दरम्यान, पोलिसांवर दगडफेक सुद्धा करण्यात आली होती. गावात कोणतेही अनुचित प्रकार घडू नये यादृष्टीने पोलिसांचा गावात कडेकोट बंदोबस्त होता. गावातील प्रत्येक चौकात पोलीस तैनात असून स्मशाम शांतता पहावयास मिळाली. पोलिसांचा बंदोबस्त कायम ठेवण्यात आल्याने गावात कालच्या घटनेचीच चर्चा केली जात आहे.