बॉलिवूडमधल्या तारकांची धूसफूस- प्रकरणं 10

प्रियांका चोप्रा आणि करिना कपूर यांचे आपसात कधीच जमलं नाही. नुकतचं या दोघींमध्ये तू तू मै मै झाली. एका ऍवार्ड फंक्शनच्या सरावासाठी प्रियांका चोप्रा प्रॅक्टीस करत होती. प्रियांकाने करिनाच्या प्रॅक्टिसचा वेळ खाल्ला मग काय करिनाचे माथं भडकलं आणि तिने निघून जाण्याची धमकी दिली.

Updated: Nov 28, 2011, 12:48 PM IST

झी 24 तास वेब टीम, मुंबई

प्रियांका चोप्रा आणि करिना कपूर यांचे आपसात कधीच जमलं नाही. नुकतचं या दोघींमध्ये तू तू मै मै झाली. एका ऍवार्ड फंक्शनच्या सरावासाठी प्रियांका चोप्रा प्रॅक्टीस करत होती. प्रियांकाने करिनाच्या प्रॅक्टिसचा वेळ खाल्ला मग काय करिनाचे माथं भडकलं आणि तिने निघून जाण्याची धमकी दिली. शेवटी शाहरुख खानने या दोघींची कशीबशी समजूत घातली.

 

कतरिना कैफ आणि अनुष्का शर्माच्यात मेकअपमन वरुन भांडणं झालं होतं. या दोघीही एकच मेकअप मॅन शेअर करायच्या. मेकअपमन अनुष्काबरोबर लंडनला 15 दिवसांच्या शूटसाठी जाणार होता. कतरिना कैफची सुरवातीला काहीच हरकत नव्हती पण तिने शेवटच्या क्षणाला मोडता घातला आणि मेकअपमनला कुठेही जाण्यास मज्जाव केला. मधल्यामध्ये अनुष्का मात्र लटकली.

कतरिना कैफ आणि जॉन अब्राहम यांच्यात न्यूयॉर्क सिनेमाच्या शुटिंगच्या दरम्यान जवळीक निर्माण झाल्याची कूजबूज सुरु झाली आणि
बिपाशा बसूचं माथं भडकलं. बिपाशा आणि जॉन त्यावेळेस एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते.

 

कतरिना कैफ आणि सोनाक्षी सिन्हा यांच्यात पण नुकतचं बिनसलं. सोनाक्षी सिन्हा काही ब्रँड एण्डोर्समेंटमध्ये कतरिना कैफची जागा घेणार
असल्याच्या बातम्या प्रसिध्द झाल्या आणि मग दोघींमध्ये बिनसलं. सोनाक्षीने कतरिनाला एसएमएस पाठवून असं काहीच घडलं नसल्याचं कळवलं पण अजूनपर्यंत कतरिनाने त्याला उत्तर दिलेलं नाही.

प्रियांका आणि कतरिना यांच्या एका ऍवार्ड फंक्शनला झकाझकी झाली. कतरिना कैफला शेवटचा परफॉर्मन्सने शोस्टॉपर व्हायचं होतं. पण
प्रियांका चोप्राला वाटलं की स्टेजवरचा शेवटचा परफॉर्मन्सची ती हक्कदार आहे. पण सरतेशेवटी प्रियांकाने माघार घेतली आणि कतरिनाला शेवटचा परफॉरमन्स सादर करण्याची परवानगी दिली. कतरिना मात्र आधीच निश्चित झाल्याप्रमाणे शेवटचा परफॉर्मन्स तिच सादर करणार असल्याचं आजही सांगते. आणि दोघी आजही एकमेकांच्या नजरेला नजर देत
नाहीत.

सोनम कपूर आणि ऐश्वर्या राय यांच्यात झालेली तू तू मै मै सर्वश्रूतच आहे. ऐश्वर्या राय बच्चनने सोनम कपूरसोबत कान आंतरराष्ट्रीय
महोत्सवात रेड कार्पेटवर एकत्र चालायला नकार दिल्यानंतर या शित युध्दाला सुरवात झाली. या दोघीही एल ओरियलच्या ब्रँड ऍम्बासॅडर आहेत. सोनम कपूरने तर ऐश्वर्यला ऑन रेकॉर्डवर आँटी म्हटलं मग ऐश्वर्याचं माथं भडकणार नाही का
? अभिषेक बच्चनने मग दोघींच्यात
समेट घडवून आणली.

 

फॅशनच्या शूटिंगच्या वेळेस प्रियांका आणि कंगना यांच्यात संबंध चांगले होते आणि दोघींनाही मोठ्या लांबीच्या भूमिका होत्या पण
सिनेमा रिलीज झाला आणि दोघींमध्ये वणवा भडकला. या सिनेमात प्रियांका आणि कंगना एकमेकांच्या सामने उभ्या ठाकल्या होत्या. प्रियांकाने कंगना नव्हे तर आपणच लीड रोलमध्ये असल्याचं स्पष्ट शब्दात म्हटलं होतं. प्रियांकाच्या या वक्तव्याने कंगना दुखावली
गेली आणि त्यानंतर त्यांच्यात दुरावा निर्माण झाला.

ऐश्वर्या राय आणि राणी मुखर्जी या दोघींमध्ये चांगली मैत्री होती. पण राणीने शाहरुखच्या चलते चलते मधली आधी ऐश्वर्याच्या वाट्याला
आलेली भूमिका स्वीकारली आणि मग त्यांच्यात फूट पडली. एकेकाळी अभिषेक बच्चन आणि राणी मुखर्जी दोघे डेटिंग करत होते. पण सरतेशेवटी ऐश्वर्याचं आणि अभिषेकचं लग्न झालं आणि त्यामुळे या दोघींची मैत्री संपुष्टात आली.

 

प्रिती झिंटा आणि राणी मुखर्जी या अगदी खास मैत्रिणी होत्या. या दोघींनी सोबत काही सिनेमात कामही केलं आणि नंतर मग त्यांच्यात जमेनासं झालं. अचानक दोघींमध्ये बेबनाव झाला आणि त्यांनी मीडियाशी बोलताना याचा स्वीकारही केला. या संदर्भात करण जोहर टॉक शोमध्ये स्पष्ट शब्दात कबुलीही दिली होती. पण आता दोघींमधलं भांडण मिटलं आहे.

अमिषा पटेल आणि करिना कपूर यांच्या सुरवाती पासूनच कधी चांगले संबंध नव्हते.