मुलगा विकत न दिल्यामुळे मुलाचाच खून

औरंगाबादमधील वैजापूर शहरात मुलगा विकत न दिल्यामुळे त्याचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सहा वर्षीय रोहित भारस्करला विकत न दिल्यामुळे दोघांनी त्याचा धारदार शस्त्रानं पोटावर वार करून खून केल्याची घटना घडली.

Updated: Apr 10, 2012, 11:40 AM IST

www.24taas.com, औरंगाबाद

 

औरंगाबादमधील वैजापूर शहरात मुलगा विकत न दिल्यामुळे त्याचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सहा वर्षीय रोहित भारस्करला विकत न दिल्यामुळे दोघांनी त्याचा धारदार शस्त्रानं पोटावर वार करून खून केल्याची घटना घडली.

 

विशेष म्हणजे खून करून मुलाचा मृतदेह शहरातील एका मंगल कार्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावरील पाण्याच्या टाकीत फेकून दिला होता. या प्रकरणी पोलिसांनी दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. यातील एकास अटक करण्यात आली असून एक जण फरार आहे. विठ्ठल भारस्कर यांना त्यांचा मित्र मोबीन शेखनं त्याचा मित्र रमजानी बेगसाठी रोहितला दोन लाख रुपयांना विकत मागितलं होतं. रमजानीला अपत्य नसल्यामुळे त्यांनी रोहितला विकत मागितलं होतं. मात्र रोहितच्या आईवडिलांनी रोहितला विकत देण्यास नकार दिला. त्यामुळे संतप्त झालेल्या मोबीन आणि रमजानीनं रोहितचं अपहरण केलं आणि त्याचा खून केला. आणि त्यानंतर मृतदेह शहरातल्या एका मंगल कार्यालयाच्या पाण्याच्या टाकीत फेकून दिला.

 

काही दिवसांनंतर मुलांना खेळताना सडण्याचा वास आल्यामुळे शोध घेतला गेला. आणि त्याठिकाणी रोहितचा मृतदेह सापडला. ७ एप्रिलपासून रोहित बेपत्ता होता. रोहितच्या वडिलांनी पोलिसांत तशी तक्रारही दिली होती. या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी भारस्कर यांना बोलावल्यानंतर तो मृतदेह रोहितचाच असल्याचं उघड झालं. पोलिसांनी रमजानी बेगला अटक केली असून मोबीन शेख फरार आहे.