'भारत-पाकिस्तान सीमेवर भिंत बांधणार'

भारत आणि पाकिस्तान यांच्यातली सीमा भिंत बांधून बंद करण्यात येणार आहे.

Updated: Oct 7, 2016, 02:01 PM IST
'भारत-पाकिस्तान सीमेवर भिंत बांधणार' title=

जैसलमेर : भारत आणि पाकिस्तान यांच्यातली सीमा भिंत बांधून बंद करण्यात येणार आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी ही माहिती दिली आहे. डिसेंबर 2018 पर्यंत ही सीमा सील करण्याचं काम पूर्ण होईल, असंही राजनाथ सिंग म्हणाले आहेत.

राजनाथ सिंग यांनी जैसलमेरमध्ये पाकिस्तानच्या सीमेवर असणाऱ्या चार राज्यांबरोबर बैठक घेतली. या बैठकीमध्ये सीमा सुरक्षेचा आढावा घेण्यात आला.