'तुमचे अश्रू खरे असतील तर..' राहुल गांधी काय म्हणाले मोदींना ?

हैदराबाद विद्यापीठातला दलित विद्यार्थी रोहित वेमुलाच्या आत्महत्येवरुन काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधलाय.

Updated: Jan 23, 2016, 05:29 PM IST
'तुमचे अश्रू खरे असतील तर..' राहुल गांधी काय म्हणाले मोदींना ? title=

बुंदेलखंड : हैदराबाद विद्यापीठातला दलित विद्यार्थी रोहित वेमुलाच्या आत्महत्येवरुन काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधलाय. तुमचे अश्रू खरे असतील तर हैदराबाद विद्यापीठाच्या कुलगुरूंचा राजीनामा घ्या, अशी मागणी राहुल गांधींनी केली आहे. रोहित वेमुलाच्या आत्महत्येनंतर पंतप्रधानांनी कालच आपलं मौन सोडलं होतं. भारतमातेनं आपला एक पूत्र गमावलाय, रोहितच्या कुटुंबाचं दु:ख मी समजू शकतो असं मोदी म्हणाले होते. त्याला आता राहुल गांधींनी प्रत्युत्तर दिलंय.

कोणत्याही पक्षाचं सरकार असो, मी शेतक-यांच्या हक्काच्या बाजूनं नेहमीच उभा राहिन असं राहुल गांधी म्हणालेत. ते बुंदेलखंडच्या दौ-यावर आहेत.