मुंबई-अहमदाबाद मार्गावर वाहनांची दोन तासांपासून कोंडी

मुंबई अहमदाबाद महामार्गावरील खानोडा टोलनाक्यावर 3 ते 4 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्यात.

Updated: Jan 12, 2017, 01:13 PM IST
मुंबई-अहमदाबाद मार्गावर वाहनांची दोन तासांपासून कोंडी title=
प्रातिनिधिक फोटो

मुंबई : मुंबई अहमदाबाद महामार्गावरील खानोडा टोलनाक्यावर 3 ते 4 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्यात.

गुजरात आणि मुंबईच्या दोन्ही दिशेला वाहनांच्या रांगाच रांगा लागल्यात. रुग्णवाहिकाही जाऊ शकत नाही अशी परिस्थिती निर्माण झालीय.

टोलनाक्यावर 2000 हजाराच्या नोटांचे सुट्टे मिळण्यास वेळ लागत असल्यामुळे वाहतूक कोंडी झाल्याचं सांगण्यात येतंय. दोन तासांपासून ही वाहतूक कोंडी कायम आहे.