सर्व आरटीओ कार्यालयं बंद करण्याचा विचार?

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी, राज्यातले विभागीय वाहतूक कार्यालये म्हणजेच आरटीओ कार्यालये येत्या काही काळात बंद करावेत का?, यावर केंद्राचा विचार सुरू असल्याचं म्हटलं आहे.

Updated: Aug 19, 2014, 09:51 PM IST
सर्व आरटीओ कार्यालयं बंद करण्याचा विचार? title=

पुणे : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी, राज्यातले विभागीय वाहतूक कार्यालये म्हणजेच आरटीओ कार्यालये येत्या काही काळात बंद करावेत का?, यावर केंद्राचा विचार सुरू असल्याचं म्हटलं आहे.

 
आरटीओ कार्यालयं ही सध्या भ्रष्टाचाराची कुरणं बनली असून, तिथे फक्त लक्ष्मी दर्शनाचाच खेळ चालतो, अशी टीका नितीन गडकरी यांनी केली. 

येत्या काही महिन्यांमध्ये आऱटीओ ऐवजी दुसरी कार्यप्रणाली वाहतूक विभागात अस्तित्वात आणण्याचे संकेतही गडकरींनी दिले, ते पुण्यात बोलत होते.
 
साध्या साध्या कामांसाठीही पैसे उकळले जातात.  आरटीओमध्ये नागरिकांची कामं होत नाहीत. त्यामुळे केंद्रीय रस्ते वाहतुक मंत्रालय आऱटीओला पर्याय ठरेल अशी यंत्रणा येत्या काही महिन्यांमध्ये राबवण्याचा विचार करत असल्याचंही गडकरी यांनी सांगितलं.
 
राज्यात आजच्या घडीला आरटीओ कार्यालयात मोठ्या प्रमाणात भष्ट्राचार चालत आहे. सामान्य माणासाला वाहन परवाना काढण्यासाठी तासनतास रांगेत थांबांवं लागतं तसेच अनेक फेऱ्या माराव्या लागतात. 

अन्यथा लायसन्स एंजट गाठावा लागतो. या सर्व कटकटीतून सामान्य माणसाची सुटका करण्यासाठी केंद्र सरकार हा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे आता आरटीओेऐवजी नवी यंत्रणा कशी असणार, ती किती परिणामकारक असणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.