दुष्काळासाठी ऊसाला जबाबदार धरायला मी राजेंद्र सिंह नाही : पवार

ऊसाला खूप जास्त पाणी लागतं, अशी चर्चा मागील काही दिवसापासून काही न्यूज चॅनेल्सवर सुरू आहे.

Updated: Apr 22, 2016, 12:37 AM IST
दुष्काळासाठी ऊसाला जबाबदार धरायला मी राजेंद्र सिंह नाही : पवार title=

पुणे : शरद पवार यांनी राजेंद्र सिंह यांना कोपरखळी हाणली आहे, "मराठवाड्यातल्या दुष्काळाला ऊस आणि कारखाने जबाबदार आहेत, असा निष्कर्ष काढायला मी जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह नाही", असं पवारांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना म्हटलंय.
 
ऊसाला खूप जास्त पाणी लागतं, अशी चर्चा मागील काही दिवसापासून काही न्यूज चॅनेल्सवर सुरू आहे. काही संस्थांनी ऊसाला हजारो लीटर पाणी लागत असल्याचं सांगितलं आहे, यावर शरद पवार यांना प्रश्न विचारला असता, त्यांनी राजेंद्र सिंह यांच्यासह ऊस पिकाला विरोध करणाऱ्यांवर बोचरी टीका केली आहे.