चॅम्पियन्स ट्रॉफी : भारतानं चीनला अक्षरश: चिरडलं!

एशियन चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताच्या हॉकी टीमनं चीनला अक्षरश: चिरडून टाकलंय. भारतानं चीनवर तब्बल 9-0 अशा फरकानं विजय मिळवला. 

Updated: Oct 26, 2016, 12:17 AM IST
चॅम्पियन्स ट्रॉफी : भारतानं चीनला अक्षरश: चिरडलं! title=

नवी दिल्ली : एशियन चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताच्या हॉकी टीमनं चीनला अक्षरश: चिरडून टाकलंय. भारतानं चीनवर तब्बल 9-0 अशा फरकानं विजय मिळवला. 

यापूर्वी भारतानं जपान आणि आपला पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानलाही लोळवलं होतं. तर दक्षिण कोरियाविरुद्धची मॅच मात्र ड्रॉ राहिली. 

चीनविरुद्ध खेळताना भारताच्या आकाशदीप सिंहनं नवव्या मिनिटाला गोल करत भारताला विजय प्राप्त करून दिला. 

या विजयासहीत भारतानं चार मॅचपैंकी तीन मॅचमध्ये विजय मिळवून 10 अंक मिळवून पहिल्या स्थानावर उडी मारलीय. तर मलेशिया तीन मॅच पैंकी तीन मॅच जिंकून 9 अंकांसहीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. 

आता, पहिल्या स्थानासाठी भारत आणि मलेशिया या दोन टीम्स दरम्यान सामना रंगेल.