अंडर 19 वर्ल्ड कप फायनलमध्ये भारत भिडणार वेस्ट इंडिजला

अंडर 19 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये वेस्ट इंडिजनं बांग्लादेशचा 3 विकेटनं पराभव केला आहे.

Updated: Feb 11, 2016, 06:50 PM IST
अंडर 19 वर्ल्ड कप फायनलमध्ये भारत भिडणार वेस्ट इंडिजला title=

मिरपूर : अंडर 19 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये वेस्ट इंडिजनं बांग्लादेशचा 3 विकेटनं पराभव केला आहे. त्यामुळे या वर्ल्ड कपची फायनल भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये होईल हे निश्चित झालं आहे. 

टॉस जिंकून बांग्लादेशनं बॅटिंगचा निर्णय घेतला आणि 50 ओव्हरमध्ये 226 रन बनवल्या. बांग्लादेशचा कॅप्टन मेहंदी हसननं सर्वाधिक 60 रन बनवल्या. तर वेस्ट इंडिजच्या किमो पॉलनं सगळ्यात जास्त 3 विकेट घेतल्या. 

त्यानंतर 227 रनचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजनं सावध सुरुवात केली, आणि 48.4 ओव्हरमध्ये आपलं निर्धारित लक्ष्य पार केलं. वेस्ट इंडिजच्या हेटमेयर आणि स्प्रिंजरच्या हाफ सेंच्युरीमुळे वेस्ट इंडिजला फायनलचा टप्पा गाठता आला.