श्रीलंकेविरुद्धच्या टी-20मध्ये भारताचा विजय

श्रीलंकेविरुद्धच्या टी-20मध्ये भारताचा ६ विकेट्सनं विजय झाला आहे. 

Updated: Mar 12, 2018, 11:47 PM IST
श्रीलंकेविरुद्धच्या टी-20मध्ये भारताचा विजय title=

कोलंबो : श्रीलंकेविरुद्धच्या टी-20मध्ये भारताचा ६ विकेट्सनं विजय झाला आहे. श्रीलंकेनं ठेवलेल्या १५३ रन्सचा पाठलाग करताना भारतानं १७.३ ओव्हरमध्ये ४ विकेट गमावून विजय मिळवला. भारताकडून मनिष पांडेनं सर्वाधिक नाबाद ४२ रन्स केल्या तर पांडे बरोबर दिनेश कार्तिकनं नाबाद ३९ रन्स केल्या.

या टी-20 ट्राय सीरिजमध्ये भारतानं श्रीलंकेविरुद्धची पहिली मॅच गमावली. यानंतर बांग्लादेशविरुद्धच्या मॅचमध्ये भारताचा विजय झाला आणि आता श्रीलंकेविरुद्धच्या या मॅचमध्येही भारतानं विजय मिळवला. 

टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतल्यानंतर भारतानं श्रीलंकेला २० ओव्हरमध्ये १५२/९ वर रोखलं. भारताकडून शार्दुल ठाकूरनं सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. तर वॉशिंग्टन सुंदरला २ विकेट मिळाल्या. जयदेव उनाडकट, युझवेंद्र चहल आणि विजय शंकरला प्रत्येकी एक विकेट घेण्यात यश आलं. श्रीलंकेकडून कुसल मेंडिसनं ३८ बॉल्समध्ये सर्वाधिक ५५ रन्स केल्या. तर उपुल थरंगाला २२ रन्स करण्यात यश आलं.