मोदी वादळानंतर....भावी मुख्यमंत्रीपदाची चर्चा, मनसेत चैतन्य

राज आणि उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून त्यांच्या पक्षांमधून नावं येतायत. मात्र दिल्लीत हा प्रयोग यशस्वी करणा-या भाजपमध्ये याबाबत संभ्रम आहे. विनोद तावडेंनी गोपीनाथ मुंडेंचं नाव पुढे केलं असलं, तरी स्वतः मुंडे मात्र बॅकफुटवर आहेत. मुख्यमंत्री महायुतीचा असेल असा विश्वास व्यक्त करतानाच त्यांनी सत्ता आल्यावर महायुतीची चर्चा होऊन मुख्यमंत्री कोण, हे निश्चित होईल, असं सांगितलंय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jun 1, 2014, 10:13 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
राज आणि उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून त्यांच्या पक्षांमधून नावं येतायत. मात्र दिल्लीत हा प्रयोग यशस्वी करणा-या भाजपमध्ये याबाबत संभ्रम आहे. विनोद तावडेंनी गोपीनाथ मुंडेंचं नाव पुढे केलं असलं, तरी स्वतः मुंडे मात्र बॅकफुटवर आहेत. मुख्यमंत्री महायुतीचा असेल असा विश्वास व्यक्त करतानाच त्यांनी सत्ता आल्यावर महायुतीची चर्चा होऊन मुख्यमंत्री कोण, हे निश्चित होईल, असं सांगितलंय.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या स्वतः विधानसभा निवडणुक लढवून मुख्यमंत्री होण्याच्या महत्त्वकांक्षेला शिवसेना नेते संजय राऊत यांनी टोला लगावलाय...शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री असल्याचा आत्मविश्वास व्यक्त करताना ते निवडणूक लढणार का याबाबतचा निर्णय काळानुसार घेतला जाईल, आम्हाला कुठलीही घाई नाही अशी भूमिका राऊत यांनी व्यक्त केली...राज ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाच्या महत्त्वकांक्षेचं शिवसेनेपुढे कुठलंही आव्हान नसल्याचं राऊत म्हणाले.
मोदींच्या त्सुनामीचा काँग्रेस एवढाच मनसेलाही फटका बसला. आणि म्हणूनच मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी विधानसभा लढवत जनतेनं कौल दिल्यास राज्याचं नेतृत्व करण्याची घोषणा केली आणि मनसैनिकांमध्येच चैतन्य पसरलयं. राज हे मुख्यमंत्रीपदाचे नवे दावेदार म्हणून चर्चेत आले असले तरी एकूणच विधानसभेसाठी असणा-या सर्वच मुख्यमंत्रीपदाच्या संभाव्य नावांविषयी जोरदार चर्चा रंगतेय.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सायनच्या सभेत ही घोषणा केली आणि मरगळलेल्या मनसे सैनिकांमध्ये जान तर आलीच पण महाराष्ट्राच्या राजकारणात एका नव्या वादळाचा जन्म या घोषणेतून झाला... मोदींच्या लाटेत खचलेल्या पक्ष संघटनेनं मोदी पॅटर्नचाच वापर करण्याचा निर्णय घेतला आणि थेट राज यांनीच विधानसभा निवडणूकांचं नेतृत्व करावं असा आग्रह धरला.
पक्षाला पुन्हा संजीवनी देण्यासाठी राज यांनीही याला अनुकुलता दर्शवली. पण या निमित्तानं भावी मुख्यमंत्री कोण, या चर्चेला अधिक हवा दिली गेली. तशी भाजप-शिवसेनेच्या निमित्तानं ही चर्चा होतीच. भाजपनं गोपीनाथ मुंडे यांचं प्यादं पुढे सरकवलंय... तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही मुख्यमंत्री होण्यास अनुकुल असल्याचे संकेत मिळतायत. राष्ट्रवादीचा आक्रमक चेहरा असलेले अजित पवार हे तर गेल्या अनेक वर्षांपासून या पदासाठी उत्सुक आहेत. काँग्रेसच्या तंबूत नेहमीचीच शांतता असली, तरी सध्यातरी पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडेच भावी मुख्यमंत्री म्हणून पाहिलं जातंय. या पाच जणांची बलस्थानं काय आणि त्यांचे कच्चे दुवे काय, त्याकडे बघणं म्हणूनच रंजक ठरेल.
राज ठाकरे
राज्यातल्या नवमतदारांना मुख्यमंत्री म्हणून आवडेल, असा राज ठाकरेंचा चेहरा आहे... त्यामुळेच मोदींनी देशात जे केलं, ते राज महाराष्ट्रात घडवू शकतील, असं मनसेच्या थिंक टँकला वाटलं, तर नवल नाही... राज यांची महाराष्ट्राच्या ब्लु प्रिंटची घोषणाही आशादायी आहे.
दुसरीकडे राज यांच्यासमोरची आव्हानंही तेवढीच कडवी आहेत. पक्षात राज यांच्याखालोखाल नेत्यांची दुसरी फळीच नाही. राज यांचं बोलणं आणि त्यांची भाषणं जितकी आक्रमक आणि गर्दी खेचणारी असतात, तसा पक्षात दुसरा नेताच नाही... सभांना येणारे लोक मतदान मनसेला करत नाहीत, हे लोकसभेचा निकालांवरून दिसलंय... मोदींकडे सांगण्यासाठी गुजरातचं मॉडेल होतं... राज यांच्याकडे असलेलं नाशिक मॉडेल फारसं आश्वासक नाही.
उद्धव ठाकरे
किंगमेकर तयार करणा-या `मातोश्री`लाही आता किंग व्हायचे वेध लागलेत, असं दिसतंय.. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार घोषीत करण्याची शिवसेना नेत्यांमध्ये जणू स्पर्धाच लागल्याचं दिसतंय. लोकसभेला शिवसेनेच्या पारड्यात महाराष्ट्रानं भरभरून मतं टाकली हे उद्धव यांचं सर्वात मोठं बलस्थान म्हणता येईल... दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भावनिक आवाहनाचा करिष्माही उद्धव यांच्या बाजूचा आहे. तसंच गेल्या काही वर्षांत उद्धव ठाकरेंनी आपल्या पद्धतीनं वाढवलेली शिवसेनेची ताकदही त्यांच्यासाठी अनुकुल आहे.
असं असलं तरी काही मोठी आव्हानं उद्धव यांच्यासमोर असतील... आणि तीदेखील बरीचशी आप्त-स्वकियांचीच... लोकसभा निवडणुकीतल्या स्वप्नवत यशानंतर भाजपला पुन्हा शतप्रतिशत बनण्याचे वेध लागलेत... शिवसेना हा त्यातला अडसर मानला जाण्याची चिन्हं आहेत... दुसरीकडे उद्धव यांचे चुलत बंधू राज ठाकरेंनी पुन्हा शड्डू ठोकल्यानं मराठी मतांचं विभाजन अटळ आहे... सर्वात महत्वाचं म्हणजे केवळ शहरी चेहर