एक्सप्रेसवेवर पुन्हा अपघात, तीन तास खोळंबली वाहतूक

विचित्र अपघातानं खोळंबलेल्या एक्स्प्रेस वेवरची वाहतूक आता सुरळीत झालीय. 

Updated: Jun 16, 2016, 03:56 PM IST
एक्सप्रेसवेवर पुन्हा अपघात, तीन तास खोळंबली वाहतूक title=

मुंबई : विचित्र अपघातानं खोळंबलेल्या एक्स्प्रेस वेवरची वाहतूक आता सुरळीत झालीय. 

पहाटेच्या सुमारास तीन गाड्या एकमेकांवर आदळून झालेल्या अपघातानं एक्स्प्रेस वेवरची वाहतूक तीन तास खोळंबली होती. मुंबईकडे येणाऱ्या वाहनांची रांग खंडाळ्यापर्यंत पोहचली होती. आता अपघातग्रस्त वाहनं आडोशी बोगद्यापरिसरातून बाजूला करण्यात आली आहेत. त्यामुळे वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येतेय.

कसा झाला अपघात... 

पहाटे मुंबईकडे निघालेल्या एका ट्रकने अज्ञात वाहनाला मागून धडक दिली. त्यामागे नशेत असलेल्या कंटनर चालकाने समोरील ट्रकला धडक दिली... आणि त्याच दरम्यान एक होंडा सिटी कार आणि एक स्विफ्ट कार समोरील अंदाज न आल्याने दुसऱ्या व तिसऱ्या वाहनाखाली घुसल्या.

सुदैवाने या अपघातात कोणतीही जिवीत हानी झालेली नाही. कंटनेरचा चालक नशेत असल्याचं पुढे आलंय.