म्हणून विराट-अनुष्काच्या लग्नाबाबत गुप्तता पाळण्यात आली

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या लग्नाच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून प्रसिद्ध होत होत्या.

Shreyas deshpande श्रेयस देशपांडे | Updated: Dec 12, 2017, 04:06 PM IST
म्हणून विराट-अनुष्काच्या लग्नाबाबत गुप्तता पाळण्यात आली title=

मुंबई : विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या लग्नाच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून प्रसिद्ध होत होत्या. सोमवारी या बातम्यांना अखेर पूर्णविराम मिळाला. विराट आणि अनुष्कानं इटलीमध्ये लग्न केलं. लग्नाची तारीख ठरल्यानंतर सगळीकडे चर्चा सुरु झाल्या होत्या पण विराटनं यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही तर अनुष्काकडून लग्नाच्या बातम्या फेटाळून लावण्यात आल्या.

लग्नाचे फोटो विकणार

एका इंग्रजी वृत्तपत्राच्या बातमीनुसार विराट आणि अनुष्का लग्नाचे फोटो आणि प्री-वेडिंग फोटो अमेरिकेच्या एका मासिकाला विकणार आहेत. यातून होणारी कमाई विराट आणि अनुष्का चॅरिटीसाठी वापरणार आहेत.

सब्यसांचीनं डिझाईन केले कपडे

११ डिसेंबरला विराट आणि अनुष्काचं इटलीच्या बोर्गो फिनोचीतो रिसॉर्टमध्ये लग्न झालं. विराट-अनुष्काचं कुटुंब आणि काही मित्र यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडला. हिंदी रिती-रिवाजांनुसार हे लग्न झालं. दोघांच्या लग्नाची थीम फ्लोरल होती. तर सब्यसांचीनं दोघांचे कपडे डिझाईन केले होते.

इकडे होणार रिसेप्शन

विराट आणि अनुष्काचं २१ डिसेंबरला दिल्लीमध्ये तर २६ डिसेंबरला मुंबईत रिसेप्शन होणार आहे. मुंबईतल्या रिसेप्शनला बॉलीवूड कलाकार आणि क्रिकेटपटूंबरोबरच अन्य सेलिब्रिटींची उपस्थिती असेल. यानंतर अनुष्का शर्मा विराट कोहलीबरोबर दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्याला जाणार आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये अनुष्का परत भारतात येईल आणि शाहरुखसोबत नव्या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करेल. विराट आणि अनुष्का मुंबईतल्या वरळीच्या घरात राहणार आहेत. विराटनं मागच्याच वर्षी हे घर घेतलं होतं.